
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. तब्बल 26 पर्यटकांचा जीव या हल्ल्यात गेला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा पठण करण्यास सांगितले. ज्या पर्यटकाला कलमा वाचता आला नाही, त्याला गोळ्या झाडण्यात आल्या. या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ पुढे आली. धडाधड करून पर्यटकांना गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले, कारण दहशतवाद्यांनी थेट धर्म विचारून जीव घेतले. गेल्या काही महिन्यापासून या दहशतवादी हल्ल्याचे प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती पुढे आली. गोळीबार करून दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्थ करत कंबरडे मोडले.
पहलगाम हल्ल्यात राज्यातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला. संतोष जगदाळे हे पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. संतोष जगदाळे मूळ पुण्याचे असून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे त्यावेळी सरकारने जाहीर केले होते. मात्र, जगदाळे कुटुंब अजूनही नोकरीसाठी वाट बघत आहे. नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांचे कुटुंबिय आसावरी जगदाळे आणि प्रगती जगदाळे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहोत. राज्य शासनाने नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र, नोकरीच्या प्रस्तावाला मंत्रालयातून अध्याप मंजुरी मिळाली नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या पीए यांना संपर्क करतोय पण आमचा संपर्क होत नसल्याचे त्यांनी यादरम्यान म्हटले. नोकरीची आस लावून जगदाळे कुटुंब बसले आहे. संतोष जगदाळे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला अत्यंत मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.