धाकधूक वाढली, रत्नागिरीतील बेपत्ता नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला, पाच जण बेपत्ताच

| Updated on: Nov 01, 2021 | 10:31 AM

नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र जवळपास सहा दिवस उलटल्यानंतरही नौकेशी कोणताही संपर्क न झाल्याने बोट मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

धाकधूक वाढली, रत्नागिरीतील बेपत्ता नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला, पाच जण बेपत्ताच
रत्नागिरीतील बेपत्ता नविद नौका (फाईल फोटो)
Follow us on

रत्नागिरी : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रत्नागिरीतील नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला. 45 वर्षीय अनिल आंबेरकर यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे, तर उर्वरित खलाशांचा शोध अद्याप सुरु आहे. 26 ऑक्टोबरपासून जयगडमधील मासेमारी बोटीचा संपर्क तुटल्याने चिंतेचं वातावरण आहे. नविद-2 या नौकेवर तांडेलसह सहा खलाशी आहेत. मात्र एका खलाशाचा मृतदेह सापडल्याने बेपत्ता बोटीविषयी भीती व्यक्त केली जात आहे.

समुद्रात गेलेली नौका बेपत्ता

नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र जवळपास सहा दिवस उलटल्यानंतरही नौकेशी कोणताही संपर्क न झाल्याने बोट मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटींनी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ सुरु केले.

संपर्क साधण्याचे आवाहन

नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल असे खलाशी आहेत. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत. त्यापैकी अनिल आंबेरकर यांचा मृतदेह सापडला आहे.

बिहारमध्ये बोट दुर्घटना

गेल्या वर्षी बिहारमध्ये गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटून भीषण अपघात झाला होता. भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात ही दुर्घटना घडली होती. या बोटीत महिलांसह लहान मुलं प्रवास करत होती. या बोटीत काही बाईक आणि सायकलही ठेवल्या होत्या. बोट उलटल्यानंतर काही प्रवाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला होता. तर काही प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तर तिघे अद्याप बेपत्ता