AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली (Boat sinking in Ganga river in Bihar).

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता
| Updated on: Nov 05, 2020 | 4:14 PM
Share

पाटणा : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली. या बोटमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या. बोट उलटल्यानंतर काही प्रवाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचले. मात्र, बरेच जण अजूनही बेपत्ता आहेत (Boat sinking in Ganga river in Bihar).

या दुर्घटनेनंतर किनाऱ्यावरील नागरिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर प्रशासनदेखील घटनास्थळ दाखल झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, अद्यापही अनेक जण बेपत्ता आहे. बचाव कार्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

बोटीत प्रवास करणारे सर्वाधिक प्रवासी हे मजूर आहेत. बोट उलटल्यानंतर जे मजूर पोहत किनाऱ्यावर पोहोचले त्यांचापैकी काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Boat sinking in Ganga river in Bihar).

बोटीतून उडी मारुन जे पोहत सुरक्षितपणे किनाऱ्यावर दाखल झाले, त्यांनी या दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली. गंगा नदीच्या किनाऱ्यावरील  गोपालपूर परिसरातील गावकरी आपल्या शेतात मक्काची पेरणी करण्यासाठी जात होते. गंगा नदिच्या पलिकडे त्यांची शेती आहे. त्यामुळे गावातील जवळपास 100 ते 125 नागरिक एकत्र बोटीत बसले. ही बोट नदीत अर्ध्या वाटेवर आली तेव्हा अचानक वादळात फसली. किनाऱ्यावर उभे असलेले नागरिक बोटीची वाट पाहत होते. त्यांना दुर्घटना घडण्याची चाहूल लागताच त्यांनी तातडीन बचाव कार्याला सुरुवात केली.

हेही वाचा : भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आग! 150 दिवसांपासून आग भडकलेलीच, 3 हजार लोक स्थलांतरीत

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.