भारत जोडो यात्रा का?; राहुल गांधींनी एकाच वाक्यात उत्तर दिलं…

आम्हाला नागरिकांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत त्यासाठी आम्ही लोकांना भेटत आहोत असं राहुल गांधींनी सांगितले.

भारत जोडो यात्रा का?; राहुल गांधींनी एकाच वाक्यात उत्तर दिलं...
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 8:04 PM

मुंबईः काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेते आता राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांबरोबर बोलताना भारत  जोडो यात्रेचा हेतूही सांगितला. राहुल गांधी यांनी बोलताना म्हणाले की, भारत बघायचा असले तर रस्त्यावर जाण्याची गरज आहे. विमान आणि हेलिकॉप्टरमधूम भारत कळणार नाही असंही त्यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेतून आम्ही नागरिकांबरोबर संवाद साधत असून लोकांच्या आम्ही रस्त्याने चालून लोकांच्या मनातला भावना ऐकून घेतो. लोकांच्या भावना ऐकून घेत असल्याने आम्ही जास्त बोलत नाही, आम्ही लोकांचं ऐकून घेतो असंही त्यांनी स्पष्ट केले.

भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील अनेक नागरिकांबरोबर संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी नागरिकांच्या समस्या, महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी या यात्रेचा हेतू सांगताना ते म्हणाले की, आम्हाला नागरिकांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. त्याबरोबरच राज्यातील अनेक प्रोजेक्ट हे गुजरातमध्ये जात आहेत. ते जाण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे गुजरातच्या निवडणुकांसाठी हे प्रोजेक्ट गुजरातमध्ये घेऊन जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात जे प्रकल्प आणि उद्योग राबवले जात आहेत. ते प्रकल्प आणि उद्योग फक्त देशातील काही मोजक्या उद्योगपतींना दिले जात असल्याचे सांगत त्यांनी केंद्रावर जोरदार टीकाही केली.

राहुल गांधी यांनी नोटबंदीविषयी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी जी नोटबंदी केली होती, ती एक प्रकरची त्यांची व्यूहरचनाच होती. त्यामुळे देशातील छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईडीविषयी बोलतानाही त्यांनी केंद्रावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, मी सीडी ईडीला घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे चीन आक्रमण करत आहे पण त्याविषयी कोणीही बोलत नाही. त्याविषयी केंद्र सरकार कोणतीही भूमिका मांडत नाही.

तर दुसरीकडे लोकांचा रोजगारही गायब झाला आहे. तर महागाईचा फटकाही जनसामान्य लोकांना बसला आहे. सध्या गॅस सिलिंडर बाराशे रुपयाने झाला आहे मात्र त्याविषयही पंतप्रधाना नरेंद्र मोदी काही बोलत नाही असा जोरदार टोला त्यांनी केंद्रावर लगावला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.