पुण्याच्या शिवाजीनगर, हिंजवडी मेट्रोला सप्टेंबरचा मुहूर्त? मोदींना फडणवीसांनी दिले निमंत्रण
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची क्षमता असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो - ३ चा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार झाला आहे. १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्याने हा टप्पा सप्टेंबरमध्ये सेवेत येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तयार असूनही या मेट्रोच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने पुणेकरांना मेट्रोची प्रतिक्षा लागली आहे.या मेट्रोमुळे पुणेकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे आणि तसेच पुणेकरांची प्रदुषणातून सुटका होणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तीन हा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, या मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटन लांबल्याचे बोलले जात आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट दिली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ही मेट्रो तीन सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.
पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे बांधकाम होऊन ती उदघाटनासाठी सज्ज झाली आहे.मात्र,तिच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने पुणेकर कातावले आहेत.या संदर्भात सोशल मीडियातून नाराजी व्यक्त होत होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुण्याच्या मेट्रो तीनच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात ही मेट्रो तीन पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी ४५ मिनिटांत
पुणेकरांची लवकरच वाहतूकीच्या कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो – तीनचा १३.३ किमीचा माण ते आर.के. लक्ष्मण म्युझियम हा १२ स्थानकांचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. हा कॉरिडॉर आता डिस्ट्रीक्ट कोर्टापर्यंत वाढवला जात असल्याने तो भविष्यात महा मेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार आहे. पुणे मेट्रो लाईन-तीन सुरु झाल्यानंतर सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासाला लागणारा हा दीड तासांचा वेळ आता केवळ ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेची मोठी बचत होणार असून प्रवाशांची प्रदुषण आणि वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.