ठाणे : ३५४ केस माझ्याविरोधात टाकली ना. त्यानंतर मी कुठलीही केस घ्यायला तयार आहे. माझी बदनामी केलीत ना, असा असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझ्यावर केस टाकून आम्ही जितेंद्र आव्हाडला (Jitendra Awad) अटकवू शकतो. कार्यकर्त्यांना घाबरावयाचं होतं ना. मला आतमध्ये फसवायचं होतं ना. मग, कार्यकर्ते (activists) आमच्यासमोर काय आहेत, हे दाखविण्याचा तो प्रयत्न होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केला.
मला अडकविण्यासाठी तुम्ही कशा-कशाचा वापर करता हे बघुया ना.याद रखना सिकंदर के होसले तो भारी थे. जब गया था दुनिया से तो दोनो हात खाली थे, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. कोण थांबवितं, कोण पायात पाय घालतं ते सर्व बघू. रणांगणात लढाईला उतरलो आहोत. मग, लढाईचे परिणाम भोगायचे असतात, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा सामाजिक चर्चेचा विषय आहे का? कुणाचंही सामाजिक आयुष्य असतं. आपण किती खालच्या दर्जावर जाणार आहोत. बहुजन नेते कसे बदनाम होतात. असल्या गोष्टींची राजकारणात चर्चा होत नाही. शिसे के घर में रहा करते हैं वो दुसरों के घरो पर पत्थर नहीं फेका करते, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.
सामाजित जीवन वेगळं असतं. तुम्ही ऐतिहासिक विषयांना स्पर्श करता तेव्हा तुमचं राजकीय जीवन वेगळं होतं. आम्ही एका राजकीय पक्षात आहोत. पण, आमचं सामाजिक जीवन वेगळं असू शकतं. कुणी नाना धर्माधिकारी यांना मानत असेल तर कुणी दुसऱ्याला मानू शकतात. वेगवेगळे विचार आहेत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना वगळण्यात आलेलं नाही. उद्याच्या दौऱ्यात वक्त्यांची जास्त यादी होती. पुढच्या सर्व दौऱ्यात अमोल मिटकरी हे आमच्या बाजूनं असतील, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.