ठाणे : कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivli) रिक्षा बंदवरून (Rickshaw Strike) सध्या चांगलचं वातावरण पेटलंय. कोकण रिक्षा (Rickshaw) टॅक्सी चालक संघटनांकडून 1 ऑगस्ट पासून अनिश्चित कालावधीसाठी रिक्षा बंदची हाक देण्यात आलीये. मात्र या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असं कल्याण डोंबिवलीतील काही रिक्षा संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलंय. इतकंच नाही तर आमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणीही संपात सहभागी होऊ न इच्छिणाऱ्या रिक्षा संघटनांच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात 28 रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही . वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटनांकडून 1 ऑगस्टपासून अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता या संपात फूट पडल्याचे चित्र असून, कल्याण, डोंबिवलीमधील काही रिक्षा संघटनांकडून या संपात सहभागी होण्यास नकार देण्यात आला आहे.
सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात 28 रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही . वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटनांकडून 1 ऑगस्ट पासून अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. अद्यापही भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटना संपावर जाण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील 4 जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 50 हजार रिक्षा चालक या संपात सहभागी होणार असल्याचा दावा देखील या संघटनेकडून करण्यात आला आहे. मात्र ही संघटना वगळता इतर अनेक रिक्षा चालक संघटनांनी या संपाला विरोध दर्शवला आहे. इतकंच नाही तर ज्यांनी संप पुकारला आहे त्यांच्यपासून आमच्या जीवाला धोका आहे असे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण परिमंडळ – 3चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन निवेदन देखील दिले आहे.
एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात गेल्या वर्षभरापासून सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या वर्षभरात सीएनजीचे दर 28 रुपयांनी वाढल्याचा दावा रीक्षाचालकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षाच्या भाड्यात देखील वाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.