Video : अखेर मध्य प्रदेशातील धरण फुटले; प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले

भोपाळ : मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातील करम नदीवर बांधलेले धरण अखेर फुटले आहे(Dam bursts in Madhya Pradesh). करम धरणातून जिथून गळती सुरु झाली होती, तेथील भिंत फुटली आहे. रविवारी सायंकाळी धरणाच्या सुमारे 25 फूट भिंतीचा काही भाग पाण्यात वाहून गेला. धरणातून प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले आहे. धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याने पुराचे स्वरूप धारण केले […]

Video : अखेर मध्य प्रदेशातील धरण फुटले; प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 8:35 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातील करम नदीवर बांधलेले धरण अखेर फुटले आहे(Dam bursts in Madhya Pradesh). करम धरणातून जिथून गळती सुरु झाली होती, तेथील भिंत फुटली आहे. रविवारी सायंकाळी धरणाच्या सुमारे 25 फूट भिंतीचा काही भाग पाण्यात वाहून गेला. धरणातून प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले आहे. धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याने पुराचे स्वरूप धारण केले आहे. यामुळे दोन गावे पाण्याखाली गेली आहेत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गासह सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

धोका टाळण्यासाठी धरण परिसरात येणारी 18 गावे आधीच रिकामी करण्यात आलीत

धरण फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता शिवराज सरकारच्या प्रशासकीय पथकांनी धरण वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्यांकडूनही मदत घेतली जात आहे. धरणाची स्थिती लक्षात घेता धोका टाळण्यासाठी धरण परिसरात येणारी 18 गावे आधीच रिकामी करण्यात आली आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी आपला नियोजित जैत दौरा रद्द केला आहे. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निर्माणाधीन धरणातील गळती आणि येथील रहिवाशांच्या बचावासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दिली. माहिती दिली. तसेच यासंदर्भात शिवराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही फोनवर चर्चा केली होती.

धरणाचे पाणी वळते करण्यासाठी बायपास कॅनल निर्माण करण्यात आला

धरण फुटण्याचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह एसीएस, एसीएस जलसंपदा आणि एसीएस होम हे भोपाळ कंट्रोल रूममधून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. अशा स्थितीत धरणाचे पाणी वळते करण्यासाठी बायपास कॅनल निर्माण करण्यात आला. यावर गत दोन दिवसांपासून अव्याहतपणे काम सुरू होतो. परंतु, कडक खडकांमुळे ते काम पूर्ण होण्यास वेळ लागला.

धार जिल्ह्यातील 12 गावे आणि खरगोन जिल्ह्यातील 6 गावे रिकामी केली

धोका टाळण्यासाठी धार जिल्ह्यातील 12 गावे आणि खरगोन जिल्ह्यातील 6 गावे रिकामी करण्यात आली. लोकांना गावांत थांबण्यास मनाई करण्यात आली असून जनावरांनाही गावाबाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. येथील स्थलांतरित लोकांना प्रशासनाकडून प्रशासनकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.