पाकिस्तानमधून येणाऱ्या विमानाला ‘सुखोई’ने घेरलं, जयपूरमध्ये उतरवलं
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणाऱ्या एका कार्गो विमानाला जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं. या विमानाच्या वैमानिकांची सध्या वायूसेनेकडून चौकशी सुरु आहे. एंटोनोव एएन-12 असं या कार्गो विमानाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि भारत यांच्या हवाई हद्दीमध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवलं जात आहे. पण अचानक पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणारं विमान […]
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणाऱ्या एका कार्गो विमानाला जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं. या विमानाच्या वैमानिकांची सध्या वायूसेनेकडून चौकशी सुरु आहे. एंटोनोव एएन-12 असं या कार्गो विमानाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि भारत यांच्या हवाई हद्दीमध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवलं जात आहे. पण अचानक पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणारं विमान पाहून भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी या कार्गो विमानाला घेरलं आणि जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, वैमानिकांची साडे चार वाजता चौकशी सुरु करण्यात आली. कराचीमधून हे विमान येत असल्याचं पाहून भारतीय वायूसेनेच्या IAF Sukhoi Su-30 MKI या लढाऊ विमानांनी कार्गो विमानाला उतरण्यास मजबूर केलं. जयपूर विमानतळावर कार्गो विमान उतरवण्यात आलं.
Government sources to ANI: Indian Air Force fighter jets force an Antonov AN-12 heavy cargo plane coming from Pakistani Air space to land at Jaipur airport. Questioning of pilots on. More details awaited. pic.twitter.com/YSZZPF9u1D
— ANI (@ANI) May 10, 2019
कार्गो विमान Ukrainian engine manufacturing company च्या मालकीचं असल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्गो विमानाने जॉर्जियामधून नवी दिल्लीसाठी उड्डाण घेतलं होतं. पण या विमानाने चुकून मूळ मार्ग ओलांडल्याची शक्यता आहे. त्यामुळेच परवानगी नसलेल्या हवाई हद्दीत प्रवेश केला, ज्यामुळे तातडीने भारतीय वायूसेनेची लढाऊ विमानं झेपावली आणि या कार्गो विमानाला जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं.