PM Kisan Yojana: 8 कोटी शेतकऱ्यांना या आठवड्यात आनंदाची बातमी मिळेल! वाचा काय घेतलाय निर्णय
8 कोटी शेतकऱ्यांना या आठवड्यात आनंदाची बातमी मिळेल!
नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) देशभरातील शेतकऱ्यांना (Farmer)वर्षभरात 6 हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर दिली जाते. आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. वर्षातून तीनवेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाते. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. विशेष म्हणजे पुढचा 13 वा हप्ता या आठवड्यात तुमच्या खात्यावर येण्याची शक्यता आहे.
खात्यावरती आलेले पैसे कसे चेक करायचे ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत खात्यावर पैसे आले आहेत का ? हे तापसण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सांगितलेल्या गोष्टी वाजून माहिती भरा. तिथं तुमचं नावं येईल, केवाईसी आणि इतर माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे आलेत का ? याची माहिती मिळेल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले आहेत. तसेच ज्यांनी नव्याने नोंद केली आहे. त्यांची माहिती आणि केवाईसी प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. ज्यांची माहिती आणि केवाईसी होणार नाही त्यांना 13 वा हप्ता मिळणार नसल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील 21 लाख लोकांना मागच्यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून हटवण्यात आलं होतं. अधिक माहितीसाठी pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यातं आलं आहे.