जत्रेत चेंगराचेंगरी, 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू! राजस्थानातील मंदिराचे दरवाजे उघडताच झालेल्या चेंगराचेंगरीने खळबळ
Rajasthan stampede : मृत्यू झालेल्या तिघा महिला भाविकांच्या कुटुबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजस्थानात (Rajasthan Stampede) चेंगराचेंगरी दरम्यान, तीन महिलांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. एका जत्रेदरम्यान, ही दुर्घटना घडली. तर कित्येक जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केला जाते आहे. राजस्थानच्या सीकर येथे असलेल्या खाटूश्यामजी मंदिरात (Khatu Shyamji Temple) दर महिन्याला जत्रा भरते. या मासिक जत्रेसाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीदरम्यान गोंधळ उडाला आणि चेंगराजेंगरी होऊन तीन महिलांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान, ही दुःखद घटना घडली. श्रावणी सोमवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. त्यावेळी ही घटना घडली. पहाटे पाच वाजता जेव्हा मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडण्यात आले तेव्हा भाविकांनी एकच गोंधळ गेला. गर्दी असल्यानं गोंधळ वाढला, चेंगराचेंगरा (Stampede News) झाली आणि तीन जणींना जागीच प्राण गमवावा लागला.
Saddened by the loss of lives due to a stampede at the Khatu Shyamji Temple complex in Sikar, Rajasthan. My thoughts are with the bereaved families. I pray that those who are injured recover at the earliest: Prime Minister Narendra Modi
हे सुद्धा वाचा(File photo) pic.twitter.com/oM2eQmE9un
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 8, 2022
या दुर्घनटेत जीव गमावलेल्या महिलांपैकी एक महिला ही हिसारची असल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य दोन महिलांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आलंय. तर एकावर खाटू श्यामजी स्थानिक रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. आता पोलिसांकडून या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी चौकशी केली जातेय.
Rajasthan | Three people died, several injured at Khatu Shyamji Temple in Sikar where a stampede occurred during a monthly fair, earlier this morning. Two injured people referred to a hospital in Jaipur. Police present at the spot. Further details awaited. pic.twitter.com/bgnL9sRr1j
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 8, 2022
मृत्यू झालेल्या तिघा महिला भाविकांच्या कुटुबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रावणी सोमवार निमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच तयारीही मंदिर प्रशासनाकडून केली जाते. मात्र खाटू श्यामजी मंदिरात घडलेल्या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जातेय.
दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थनाही केली आहे. तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून सर्व प्रशासकीय यंत्रणांना मदतीचे निर्देशही जारी केलेत.