भाजपा मुख्यमंत्र्यांनी कालीघाट मंदिरात खाल्ले मासे; ‘व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज’ वादावर म्हणाले

पश्चिम बंगालमधील परंपरेनुसार देवीला मासे आणि मांसाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. यावरून वादाला फोडणी मिळाली होती. आता स्वतः भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मंदिरात मासे खाल्ल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.

भाजपा मुख्यमंत्र्यांनी कालीघाट मंदिरात खाल्ले मासे; व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज वादावर म्हणाले
भाजपा मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी कालीघाट मंदिरात खाल्ले मासे; 'व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज' वादावर म्हणाले
Image Credit source: video grab/Twitter
| Updated on: Sep 11, 2026 | 7:11 PM

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज’ वादावरून तीव्र पडसाद उमटले होते. धर्मगुरूबागेश्वर बाबा यांनी हावडा येथील एका कार्यक्रमात बंगाली हिंदूंना एक अजब आवाहन केले होते. “दुर्गा पूजेदरम्यान बंगाली हिंदूंनी मांसाहार करणे टाळावे,” असे त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर बंगालमध्ये धार्मिक स्वातंत्र्यावरून तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा मोठा वाद पेटला होता. तृणमूल काँग्रेसने भाजपवर ‘उत्तर भारतीय संस्कृती’ बंगालवर लादण्याचा आरोप केला होता. आता बंगालचे भाजप नेते आणि मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी कोलकात्याच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन  ‘माशांचा महाप्रसाद’ ग्रहण केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, भाजपने या कृतीद्वारे बंगालमधील अन्न संस्कृतीवरील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सुवेंदु अधिकारी यांनी मंदिरात काय केले?

कौशिकी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी कालीघाट मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिरात खाली बसून तिथला पारंपारिक महाप्रसाद घेतला. या महाप्रसादात माशाचे डोके, फ्राईड फिश आणि बसंती पुलाव यांचा समावेश होता. अधिकारी यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर करत विरोधकांना चोख उत्तर दिले. भाजपवर होणारे आरोप खोडून काढण्यासाठी पक्षाच्या इतर नेत्यांनीही स्थानिक संस्कृतीची पाठराखण केली.

“हा आमचा पारंपारिक प्रसाद!”

या वादावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी म्हणाले, “मी एक सनातनी हिंदू आहे. महाअष्टमीला आणि कार्तिक महिन्यात मी पूर्णपणे सात्विक जेवण जेवतो. पण माँ कालीला अर्पण केलेला माशाचा भोग हा आमचा पारंपारिक आणि शतकानुशतके जुना प्रसाद आहे. हा प्रसाद ग्रहण करणे आमच्या श्रद्धेचा भाग आहे.” भाजपवर होणारे आरोप खोडून काढण्यासाठी पक्षाच्या इतर नेत्यांनीही स्थानिक संस्कृतीची पाठराखण केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धीरेंद्र शास्त्री दुसऱ्या राज्यातून आले आहेत, बंगालच्या लोकांनी काय खावे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. बंगाली लोक मासे-मांस खाणारच.” तर भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी, “सुवेंदु अधिकारी यांनी बंगालच्या परंपरेचा मान राखला असून आता हा वाद इथेच संपला पाहिजे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us