
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बदाम हे एक बीज आहे ज्यामध्ये मोठे झाड बनण्याची क्षमता आहे. जर बदाम योग्य प्रकारे खाल्ले नाहीत तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मते, बदाम रात्री भिजत ठेवा आणि नंतर सकाळी त्यांची साले काढून सेवन करा. बदामची साल काढून टाकल्यानंतर ते खाल्ल्याने तुम्ही कंपाऊंडपासून मुक्त होऊ शकता.

बदामात फायबर, कॅल्शियम, मँगनीज, फॉस्फोरस, कॉपर, आयरन, पोटेशियम, राइबोफ्लेविन असते. ते शरीरासाठी अधिक पोषक असते.

बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. बदामामध्ये मुबकल प्रमाणात फायबर आढळतात. यामुळे रक्तातील साखर वाढत नाहीत. यामुळे ज्यांना मधुमेह आहेत ते रुग्ण सुद्धा बदामाचे सेवन करू शकतात.

बदामाच्या शरीरातील साखरेची पातळी कमी करतो. रक्तदाब कमी करतो. तसेच बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. बदामामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित बदामाचे सेवन फायदेशीर आहे.

Disclaimer येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. तिला 'टीव्ही ९ मराठी' दुजोरा देत नाही.कृपया संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.