
तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 137-9 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघालाही 20 ओव्हरमध्ये 137-8 धावा करता आल्या.

सामना टाय झाला, शेवटची ओव्हर कॅप्टन सूर्यकुमार यादवने टाकली. ओव्हरमध्ये श्रीलंका संघाने दोन विकेट गमावल्या आणि सामना टायपर्यंत संपला.

सूर्यकुमार यादवआधी रिंकू सिंह याने ओव्हर टाकली. दोघांनीच खऱ्या अर्थाने सामना फिरवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 12 बॉलमध्ये 09 धावांची श्रीलंका संघाला गरज होती.

रिंकू आणि सूर्याने ओव्हर टाकत सामना टाय केला. आता सुपर ओव्हर कोण टाकणार? सूर्यकुमारकडे त्यावेळी दोन पर्याय होते, त्यामध्य मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर. यामध्ये सूर्याने सुमंदरकडे चेंडू सोपवला.

वॉशीने पहिला चेंडू वाईड टाकला, त्यानंतर दोन धावा दिल्या आणि सलग दोन विकेट घेत टीम इंडियासाठी विजय मिळवणं सोपं केलं. सुर्यकुमार आणि गिल ओपनिंगला आले तर सूर्याने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने टीम इंडियाने आपल्या खिशात घातली.