WI vs IND 2023 | Virat Kohli याचा विंडिज दौऱ्यात ‘वनवास’ संपणार?

Virat Kohli West Indies vs Team India | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे.

Sanjay patil | Updated on: Jul 11, 2023 | 4:11 PM
1 / 6
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेनिमित्ताने टीम इंडियाच्या विराट कोहली याचा 7 वर्षांचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विराटने विंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक हे 7 वर्षांपूर्वी केलं होतं.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेनिमित्ताने टीम इंडियाच्या विराट कोहली याचा 7 वर्षांचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विराटने विंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक हे 7 वर्षांपूर्वी केलं होतं.

2 / 6

विराटने विंडिज विरुद्ध 2016 मध्ये अखेरचं कसोटी शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे विराटचं विंडिज विरुद्धचं हे द्विशतक होतं. तेव्हा विराटने 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 धावा केल्या होत्या.

3 / 6

विराटसाठी हे द्विशतक अविस्मरणीय असं होतं. कारण विराटने हे द्विशतक दिग्गज विवियन रिचर्डस यांच्यासमोर केलं होतं. या द्विशतकानंतर रिचर्डस यांनी विराटचं कौतुक केलं होतं.

4 / 6

विराट 2016 नंतर 2019 मध्ये विंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हा विराटने 2 अर्धशतकं लगावली. मात्र विराटला या खेळीचं शतकात रुपांतर करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे आता विराटकडून या दौऱ्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

5 / 6

विराटला एका शतकासह 2 धमाके करण्याची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे विराटचं विंडिंज विरुद्ध 7 वर्षांनंतरचं पहिलं शतक ठरेल. तर साडे चार वर्षानंतर परदेशातील शतकाची प्रतिक्षा संपेल.

6 / 6

विराटने परदेशातील अखेरचं कसोटी शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 मध्ये पर्थ इथे ठोकलं होतं. विराटने त्या शतकी खेळीत 257 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 123 धावा केल्या होत्या. (All Photos Credit : PTI/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us