
जागतिक आरोग्य संघटना WHO च्या एका अहवालानुसार प्रौढ व्यक्तीने ४ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. WHO च्या म्हणण्यानुसार जास्त मिठाचे सेवन अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे हे सेवन प्रमाणात म्हणजेच ४ ग्रॅम पर्यंतच असावे. पण एक महिना मीठ खायचं पूर्णपणे बंद केलं तर काय होऊ शकतं? बघुयात...

बऱ्याच वेळा लोक कमी कॅलरीयुक्त डाएटमध्ये जेवण टाळू लागतात. परंतु आरोग्य तज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात. डाएट कोणत्याही पद्धतीचं असो, जेवण वेळेत व्हायला हवं. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 5 वेळा जेवण घ्या. कमी खा पण जेवण करा.

एक महिना मीठ न खाल्ल्यास त्याचा परिणाम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनास समस्या येऊ शकतात. मीठ खाल्ल्याने त्याचा परिणाम विविध अवयांवर होऊ शकतो.

मिठाचं सेवन एक महिना बंद केलं तर त्याचा परिणाम मेंटल हेल्थवर होऊ शकतो. याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मिठाचं सेवन बंद झाल्याने आयुष्य चिंता, तणावग्रस्त होऊ शकतं. त्यामुळे एकदम मीठ खाणं बंद करण्यापेक्षा त्याचं सेवन कमी करावं पण ते बंद करू नये.

जास्त मीठ खाऊ नये असं नेहमी सांगितलं जातं. मिठाचं अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी घातक असतं. मिठात असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढू शकतो. अति सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.