
आपण घाईत असताना घरी गेल्यावर कशीही चप्पल काढतो. यामुळे चप्पल, बूट किंवा सँडल उलटे होतात. जेव्हा तुमच्या घरातील चप्पल किंवा बूट उलटे होतात तेव्हा घरातील वडिलधारी माणसं लगेचच चप्पल सरळ करायला सांगतात.

आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्ती आपल्याला उलटे चप्पल, बूट दिसले की सरळ करा असा सल्ला देतात. दाराबाहेर चप्पल उलटी असल्याने काय फरक पडणार असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो.

दारात उलट पडलेल्या बूट किंवा सँडल असतील तर घरात भांडण होतात, असं अनेकदा आपल्याला सांगितले जाते. पण फक्त भांडण होणं हे चप्पल सरळ करण्याचे एकमेव कारण नाही. यामागे मोठे शास्त्र दडलेले आहे.

आपल्या धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की बूट आणि चप्पल उलट्या ठेवल्याने घरात नकारात्मकता येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांची भांडणे होतात.

बूट आणि चप्पल उलटे ठेवल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि आर्थिक नुकसान होते. जर तुम्ही सातत्याने बूट आणि चप्पल उलटे ठेवत असाल तर घरातील माणसे आजारी पडण्याची शक्यता असते.

बूट आणि चप्पल उलटे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून बूट आणि चप्पल नेहमी योग्य ठिकाणी ठेवाव्यात. जर बूट आणि चप्पल उलटे ठेवले तर शनिदेव रागवतात.

वास्तुशास्त्रानुसार शनिदेवाला पायांचा कारक मानले जाते. त्यामुळे आपल्या दाराबाहेर किंवा इतर ठिकाणी जर चप्पल उलटे राहिली तर शनिदेव रागावतात. यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होतो, ज्यामुळे आपल्या घरात अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात.

बूट आणि चप्पल कधीच उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. कारण या दिशा लक्ष्मी देवीच्या मानल्या जातात. यामुळे या दिशांना बूट आणि चप्पल ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

त्यामुळे घराबाहेर बंद कॅबिनेट आणि रॅकमध्ये बूट चप्पल ठेवाव्यात. कारण बंद कॅबिनेट नकारात्मकता पसरण्यापासून रोखतात.