AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi | ब्रिटनमधून राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, माझ्या फोनमध्ये हेरगिरी करणारे पेगासस होते.. काय घडतंय?

लंडनमधील नावाजलेल्या केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी भारतातील केंद्र सरकारवर हे गंभीर आरोप केलेत.

Rahul Gandhi | ब्रिटनमधून राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, माझ्या फोनमध्ये हेरगिरी करणारे पेगासस होते.. काय घडतंय?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 03, 2023 | 10:08 AM
Share

लंडन : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ब्रिटनमध्ये भाषण करताना मोठा दावा केला आहे. माझ्या फोनमध्ये पेगासस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर आले होते. फक्त माझ्याच नव्हे तर भारतातील इतर अनेक नेत्यांच्या फोनमध्येही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले होते.भारतात लोकशाही धोक्यात आहेत. अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. एवढंच नाही तर सरकारने सर्वच संस्थांवर ताबा घेतलाय. माध्यम आणि कोर्टावरही सरकारने कब्जा केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय.  लंडनमधील नावाजलेल्या केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी भारतातील केंद्र सरकारवर हे गंभीर आरोप केलेत.

गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली माहिती…

राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. तेथील केम्ब्रिज बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, मला गुप्तहेर अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. माझा फोन रेकॉर्ड केला जातोय. फक्त मीच नव्हे तर देशातील अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्येही पेगासस सॉफ्टवेअर लावण्यात आले आहे. विरोधी नेत्यांचे फोन टॅप केले जातायत. मी न केलेल्या गुन्हांवरून खटले दाखल करण्यात आले. पण अशाही स्थितीत आम्ही बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. त्यांना खोट्या केसमध्ये फसवलं जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

‘लोकशाही धोक्यात’

काँग्रेस नेते सॅप पित्रोदा यांनीही राहुल गांधी यांचा केम्ब्रिज विद्यापीठातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट केलाय. या व्हिडिओत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा, भारतीय लोकशाही, माध्यमं, न्यायपालिका यासारख्या विषयांवर भाष्य केलंय. राहुल गांधी यांनी केम्ब्रिज विद्यापीठात ‘लर्निंग टू लिसनिंग’ म्हणजेच ऐकण्याची कला शिकणं यावर भाषण केलं. यावेळी त्यांनी पेगासस विषयी दावा केला. माझा फोन रेकॉर्ड केला जातोय, असं गुप्तहेरांनी मला सांगितलं. काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यानचा एक किस्सा राहुल गांधी यांनी सांगितला. माझ्याकडे एकजण आला. काही लोकांकडे बोट दाखवून तो म्हणाला, ते उग्रवादी आहेत. मी त्यांच्याकडे बारकाईनं पाहिलं. त्यांनीही माझ्याकडे पाहिलं. पण ते काही करू शकले नाहीत. ऐकण्याची कला आणि अहिंसेत ही ताकद आहे, असं राहुल गांधी भाषणादरम्यान म्हणाले.

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?