Rajya Sabha Election : छत्रपती संभाजीराजे म्हणतात, पत्रकार परिषदेत सत्यच बोललो, श्रीमंत शाहूंच्या विधानावर बोलण्यास नकार

| Updated on: May 28, 2022 | 6:24 PM

एका सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी दिली त्याचा आम्हाला आनंद आहे. असे म्हणतानाच त्यांनी छत्रपती घराण्याचा कोणताही अपमान झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवा असे म्हणता येणार नाही, असे म्हणत संभाजीराजे यांचे कानही टोचले.

Rajya Sabha Election : छत्रपती संभाजीराजे म्हणतात, पत्रकार परिषदेत सत्यच बोललो, श्रीमंत शाहूंच्या विधानावर बोलण्यास नकार
छत्रपती संभाजीराजे म्हणतात, पत्रकार परिषदेत सत्यच बोललो, श्रीमंत शाहूंच्या विधानावर बोलण्यास नकार
Image Credit source: tv9
Follow us on

कोल्हापूर : शिवसेनेने (Shivsena) आपल्या निर्णयावर ठाम राहात संजय पवार यांना उमेदवारी दिल्याने संभाजी छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) यांनी राज्यासभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (shrimant Shahu chhatrapati) यांनी संजय यांना तिकीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी दिली त्याचा आम्हाला आनंद आहे. असे म्हणतानाच त्यांनी छत्रपती घराण्याचा कोणताही अपमान झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवा असे म्हणता येणार नाही, असे म्हणत संभाजीराजे यांचे कानही टोचले. त्यानंतर आता त्यावर संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. याबबत ट्विट करत संभाजीराजे म्हणतता, “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.” असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

संभाजीराजे यांचं ट्विट

संजय राऊत घेणार भेट

संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे आशीर्वाद मी जाऊन घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वक्तव्याचं कौतुकही केलं आहे. आम्ही राज्यसभेच्या निवडणूकीत राजकारण केले नाही. कोणीतरी संभाजीराजेंना पुढे करून माहाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचे
प्रयत्न करत होते ते यावरून स्पष्ट झाले आहे. आजही कोल्हापुरच्या मातीत प्रामाणिकपणा जिवंत आहे. मी शाहू माहारांजाना भेटणरा आणि त्यांचे आशिर्वाद घेणार, असे राऊत म्हणाले आहेत.

भाजपने संभ्रम निर्माण केला

भाजपने जो राज्यात संभ्रम निर्माण केला होता, तो आता शाहु माहारांजानी दूर केला, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं आहे.  काल फडणवीस यांनी म्हटले की शिवसेनेने संभाजी राजेंची कोंडी केली
हे कीती खोटे होते ते यावरून आज स्पष्ट झाले आहे, असे म्हणत राऊतांनी भाजवरही हल्लाबोल चढवला आहे. तसेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांहीही राजेंना पुढे करून मतांचं विभाजन करणे ही फडणवीसांची खेळी असल्याचे म्हटले होते. यावर आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र आता संभाजीराजेंच्या ट्विटने नवा संभ्रमही निर्माण झाला आहे.