राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचा बडा खासदार शिंदेंच्या जवळच्या नेत्याच्या भेटीला; लवकरच…

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेले आहेत.

राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचा बडा खासदार शिंदेंच्या जवळच्या नेत्याच्या भेटीला; लवकरच...
uddhav thackeray and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2026 | 5:57 PM

Bhausaheb Wakchaure : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे काही नेते, खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. हाच दावा करताना ऑपरेशन टायगरचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. विशेष म्हणजे एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंचे काही खासदार शिंदे तसेच शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांना भेटल्याचे समोर आले आहे. असे असतानाच आता ठाकरे यांचा आणखी एका खासदाराने एकनाथ शिंदे यांच्या जवळ मानल्या जाणाऱ्या मंत्री उदय सामंत यांना भेटला आहे. सामंत आणि या खासदाराची भेट झाल्याचे समोर आले आहे.

भाऊसाहेब वाकचौरे उदय सामंत यांच्या भेटीला

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. वाकचौरे यांच्याआधी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

संजय दीना पाटील यांचा शिंदेंसोबत प्रवास

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय दीना पाटील हेदेखील असेच चर्चेत आले होते. संजय दीना पाटील तसेच एकनाथ शिंदे यांनी एखाच गाडीतून प्रवेश केला होता. हे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हेदेखील शिंदेंच्या भेटीला पोहोचले होते. आता वाकचौरे हे उदय सामंत यांना भेटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमकं काय घडतंय? भविष्यात ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या पक्षात जाणार का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांना पेव फुटले आहे.

दरम्यान, ठाकरेंचे एकूण सहा खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. परंत नंतर शिंदे यांनीच ऑपरेशन टायगर सक्रीय नसल्याचे सांगितले होते. परंतु आता या गाठीभेटींनंतर भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us