AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete | महाराष्ट्राच्या राजकारणाचं भरून न निघणारं नुकसान, विनायक मेटेंच्या निधनानंतर अमित शहांचा शोकसंदेश

बीडहून मुंबईच्या दिशेने जात असताना सकाळी पाच वाजेच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला आयशरची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की घटनेनंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vinayak Mete | महाराष्ट्राच्या राजकारणाचं भरून न निघणारं नुकसान, विनायक मेटेंच्या निधनानंतर अमित शहांचा शोकसंदेश
Image Credit source: social media
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 16, 2022 | 3:47 PM
Share

बीडः शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra politics) वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून ईश्वर त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्याची प्रेरणा देवो, असा शोकसंदेश देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पाठवला आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाने हा संदेश आज मिळाला असून अमित शहांनी मेटे यांच्या कुंटुबियांची सांत्वना केली आहे. 14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. बीडहून मुंबईच्या दिशेने जात असताना सकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला आयशरची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की घटनेनंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमित शहांचा संदेश काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाने शोकसंदेशाचे पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिलेय, विनायक मेटे यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकून मी व्यथित झालो. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कधीही भरून न निघाणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी खेद व्यक्त करतो. दिवंगत आत्म्याला नम्रपणे श्रद्धांजली अर्पण करत ईश्वराकडे प्रार्थना करतो.. शोकाकूल कुटुंबाला आणि समर्थकांना या संकटात धीराने सामोरे जाण्याची शक्ती प्रदान करो… अशा आशयाचा हिंदी भाषेतील शोक संदेश अमित शहा यांनी पाठवला आहे.

घातपाताचा संशय का?

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. तर मेटे यांच्या पत्नीनेदेखील असेच आरोप केले आहेत. यापूर्वीदेखील विनायक मेटेंचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा गौप्यस्फोट मेटे यांचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. त्यांच्या बोलण्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. मायकर हे 3 ऑगस्ट रोजी मेटे यांच्यासोबत प्रवास करत होते. तेव्हा शिक्रापूरहून दोन किमी अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यात आयशर ट्रकदेखील होता. या गाड्या कधी मागे राहत होत्या तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होत्या, असं मायकर यांनी सांगितलं. दरम्यान, मायकर यांनी दिलेली माहिती तसेच मेटे यांच्या मृत्यूची संदिग्ध वेळ यावर खुलासा झालाच पाहिजे, अशी मागणी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?