राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, कुठे तुरळक, तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

कोकण किनार पट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, कुठे तुरळक, तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 19, 2020 | 10:14 AM

पुणे : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा (Maharashtra Rain Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनार पट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा (Maharashtra Rain Update) इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आज (19 एप्रिल) मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 20 एप्रिलला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडात वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, विदर्भात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

21 एप्रिलला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यात 19 एप्रिलला आकाश अंशतः ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे (Maharashtra Rain Update).

चंद्रपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

चंद्रपूर शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह पावसाने शहर-जिल्ह्याला झोडपून काढले. सुमारे 2 तास हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. तर सकाळी आकाशात ढग नसतानाही अचानक पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. चंद्रपुरात रात्री तब्बल 55 मिमी पावसाची नोंद झाली.

नागपुरातही वादळी वाऱ्यासह पाऊस

नागपूरात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. हवामान खात्याने आधीच पावसाचा इशारा दिला होता. भर उन्हाळ्यात झालेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर नागपुरातील वाढलेल्या तापमानातही घट झाली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे.

सोलापुरात गारपीटीसह जोरदार पाऊस

सोलापुरात झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच कोरोनामुळे सोलापुरातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ओढवले आहे. पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेल्या कडब्याचंही पावसात नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांच्या घरावरची पत्रे उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

Maharashtra Rain Update

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.