Manoj Jarange Patil : मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करायचंय? राज्य सरकारचे ‘हे’ नियम पाळावेच लागणार
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक असते. त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलनासाठी आंदोलकाला सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमातील अटी-शर्तींची पूर्तता आंदोलकांना करावी लागणार आहे, असे महत्त्वाचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, येत्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार […]
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक असते. त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलनासाठी आंदोलकाला सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमातील अटी-शर्तींची पूर्तता आंदोलकांना करावी लागणार आहे, असे महत्त्वाचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, येत्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार होते. मात्र या आंदोलनापूर्वीच मुंबई हायकोर्टाकडून मनोज जरांगे पाटलांना मोठा दणका देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील वर्दळ, गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई हायकोर्टाने एक मोठा निर्णय घेत मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आदेशामागे कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच आंदोलनामुळे सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश आहे. यापुढे आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कोणत्याही गटाला किंवा व्यक्तीला या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली

