AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Tyre Air Tips: कारच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरावे की सामान्य हवा? फायदा कशात जाणून घ्या?

Nitrogen Air in Car Tyres: कार टायर्समध्ये नायट्रोजन हवा भरावी की सामान्य हवा भरावी याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. फायदा कशात आहे यावर अनेकदा चर्चा होते.

Car Tyre Air Tips: कारच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरावे की सामान्य हवा? फायदा कशात जाणून घ्या?
कारच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरावे की सामान्य हवा?
| Updated on: Jun 25, 2026 | 4:03 PM
Share

Nitrogen Air in Car Tyres: कार चालवणारे अनेक लोक अनेकदा संभ्रम दिसतो. टायरमध्ये सामान्य हवा भरावी की नायट्रोजन हवा भरावी याबाबत संभ्रम तयार होतो. पेट्रोल पंप आणि सर्व्हिस सेंटरवर नायट्रोजन गॅस भरण्याचा सल्ला देण्यात येतो. काही जण सामान्य हवेपेक्षा नायट्रोजन हवा भरणे योग्य मानली जाते. तर सामान्य हवेत जवळपास 78% नायट्रोजन पूर्वीपासूनच असते असा पण एक समज आहे. त्यामुळे या दोन्हीमध्ये काय फरक असतो, तुमच्या कारच्या टायरमध्ये कोणती हवा भरणे योग्य राहील?

सामान्य हवा अथवा नायट्रोजनमध्ये अंतर काय?

सामान्य हवा : सामान्य हवेचा विचार करता त्यात अनेक गॅसचे मिश्रण असते. यामध्ये जवळपास 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि उर्वरीत 1% सारख्या कार्बन डायऑक्साईड आणि ऑर्गन यांचा समावेश असतो. यामध्ये ऑक्सिजनसह नैसर्गिक ओलावा (Moisture) सुद्धा टायरमध्ये जाते.

नायट्रोजन गॅस: टायरच्या वापरासाठी कमर्शियल नायट्रोजन गॅस जवळपास 100 टक्के शुद्ध आणि पूर्णपणे कोरडी हवा असते. यामध्ये ऑक्सिजनची मात्र नसल्यातच जमा असते. त्यामुळे या हवेत ओलावा नसतो हे निश्चित आहे.

टायरमध्ये नायट्रोजन भरण्याचे फायदे काय?

Tyre मध्ये दाब स्थिर राहतो

सामान्य हवेत ओलावा कमी होऊन टायरमधील हवा गरम होते. त्यामुळे टायरमधील दाब कमी जास्त होतो. नायट्रोजनमध्ये ही बाब कमी होते. त्यामुळे प्रेशर अधिक स्थिर असते. टायरमधील दाब अधिक कमी जास्त होत नाही.

हवा हळूहळू कमी होते

नायट्रोजनचे मॉलिक्यूल्स मोठे असतात. त्यामुळे रबरातून लवकर बाहेर पडतात. त्यामुळे ही हवा बराच वेळ टायरमध्ये राहते आणि दाब दीर्घकाळपर्यंत टिकतो. नायट्रोजन ड्राय असते. यामध्ये ओलावा नसतो. त्यामुळे व्हिल्स रिम्समध्ये गंज लागण्याचा धोका कमी होतो.

नायट्रोजन हवेमुळे नुकसान काय?

नायट्रोजन हवेचे फायदेच नाहीत, तर नुकसान पण आहेत. या हवेसाठी खर्च जास्त येतो. सामान्य हवा अनेक पेट्रोलपंपावर मोफत मिळते. तर नायट्रोजन हवा भरण्यासाठी 150-200 रुपयांपर्यंत खर्च येतो. नायट्रोजन हवा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसते. छोटी शहरं, गावात नायट्रोजन हवा मिळत नाही. गरजेच्यावेळी ही हवा मिळत नाही. त्यामुळे जर सामान्य हवा भरली तर नायट्रोजनची शुद्धता कमी होते. त्यामुळे नायट्रोजन टायर्समधील दाब एकसारखा टिकत नाही.

तुमच्यासाठी काय फायदेशीर?

जे लोक दूरचा प्रवास करतात, त्यांच्यासाठी नायट्रोजन हवा चांगली मानली जाते. जे वेगाने कार दामटतात, त्यांच्यासाठी नायट्रोजन हवा भरणे चांगले ठरू शकते. रेसिंग कार आणि विमानाच्या टायर्समध्ये सक्तीने नायट्रोजन हवेचाच वापर करण्यात येतो. पण ज्यांना सामान्य हवा भरायची आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला ठरतो. रोज कार्यालयात जाणे, बाजारात जाणे अथवा जवळच्या शहरासाठी प्रवास करत असाल तर सामान्य हवा भरणे फायदेशीर ठरते.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?