पती बाहेरुन आला अन् जेवायला बसला, मग जे समोर आलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला !

| Updated on: May 09, 2023 | 9:43 PM

पती रात्री घरी आला असता त्याने जेवण मागितले. पत्नीने केवळ भाजी बनवली होती ती वाढली. पतीने भात बनवायला सांगितला. मात्र पत्नीने नकार दिला.

पती बाहेरुन आला अन् जेवायला बसला, मग जे समोर आलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला !
भात दिला नाही पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

संबलपूर : घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने भात बनवून दिला नाही म्हणून पतीने तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जामनकिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुआधी गावात रविवारी रात्री ही घटना घडली. सनातन धारुआ असे 40 वर्षीय आरोपीचे नाव असून, पुष्पा धारुआ असे 35 असे पीडितेचे नाव आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. पोलिसांनी सोमवारी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

पत्नीने भात बनवला नाही म्हणून पती संतापला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनातन रविवारी रात्री घरी आला आणि जेवायला बसला. जेवताना त्याने पाहिले तर पत्नीने भात केला नव्हता तर फक्त भाजी शिजवली होती. यानंतर पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात सनातनने आपल्या पत्नीवर वार करून तिची हत्या केला. यावेळी त्यांची दोन्ही मुले घरी नव्हती. मुलगी घरकाम करते, तर मुलगा त्या रात्री मित्राच्या घरी झोपला होता.

मुलगा घरी आल्यानंतर घटना उघडकीस

मृत महिलेचा मुलगा घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलगा घरी येताच त्याला आई मृतावस्थेत दिसली. त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर आरोपी पतीला अटक केली आहे. आईच्या हत्येमुळे दोन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा