Pimpri -Chinchwad Crime| 11 महिन्यात145 बलात्कार तर 333 विनयभंगाच्या तक्रारी; ओळखीच्या लोकांकडून होतोय अत्याचार

| Updated on: Dec 15, 2021 | 4:48 PM

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दाखल झालेल्या जानेवारी ते ऑक्टोबर महिनन्यात 137  बलात्काराच्या गुन्हांची नोंद झाली. या सर्व गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. यात सर्व आरोपी   पीडित महिलेचे नातेवाईक, किंवा ओळखीचे असल्याचे समोर आले आहे.

Pimpri -Chinchwad Crime| 11 महिन्यात145 बलात्कार तर 333 विनयभंगाच्या तक्रारी; ओळखीच्या लोकांकडून होतोय अत्याचार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us on

 पिंपरी – पिंपरी – चिंचवड शहरात सातत्याने महिलांवर बलात्कार(rape) , विनयभंग (molestations) केल्याच्या घटना सर्वसामान्यांसाठी नवीन नाही. यात भर की काय म्हणून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या सगळयात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे नात्यातील, किंवा ओळखीतील लोकांकडूनच अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. एकट्या पिंपरी- चिंचवड शहरात जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या 11 महिन्याच्या काळात बलात्काराचे 145  तर विनयभंगाचे 333  गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

137  बलात्काराच्या गुन्ह्यांची उकल

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दाखल झालेल्या जानेवारी ते ऑक्टोबर महिनन्यात 137  बलात्काराच्या गुन्हांची नोंद झाली. या सर्व गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. यात सर्व आरोपी   पीडित महिलेचे नातेवाईक, किंवा ओळखीचे असल्याचे समोर आले आहे. यास पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीना अटकही केली आहे.

विनयभंगाच्या गुन्ह्यांची उकल
पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या विनय भंगाच्या तक्रारीतील 99 टक्के तक्रारींची उकल करण्यात आली आहे. यामध्ये विनयभंग हा पीडित महिलेच्या , मुलीच्या नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांनी केलया असल्याचे समोर आले आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची उकल करत आरोपीला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. प्रत्येक पोलीस स्थानकात महिला व बाळ संरक्षण समिती आहे. पीडितांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करून घेत असल्याचे माहिती सहपोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी सांगितले आहे.

Aryan Khan | दर शुक्रवारी NCB ऑफिसवारी टळली, आर्यन खानच्या जामीन अटीत बदल

Video: चिमुरड्यांना पाठीवर उचलून रस्त्याच्या कडेला पोहचवलं, नेटकरी म्हणाले, भाऊ असावा तर असा!

Nashik|‘महाप्रित’मधून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांना उद्योग, स्वयंरोजगार मिळावा; सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांचे आवाहन