बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या आयुष्यातील अशी एक गोष्टी समजली की आधी तो डिप्रेशनमध्ये गेला, नंतर एक दिवस….

मुलगा-मुलगी दोघेही सुरुवातीच्या दिवसात परस्परांना समजून घेतल्यानंतर लग्नाचा उद्देश ठेवतात. पण तेच नशिबवान असतात, ज्यांच हे स्वप्न सत्यात उतरतं.

बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या आयुष्यातील अशी एक गोष्टी समजली की आधी तो डिप्रेशनमध्ये गेला, नंतर एक दिवस....
| Updated on: Jul 30, 2025 | 2:13 PM

प्रेमात पडल्यानंतर अनेक जण लग्नाची स्वप्न बघतात. मुलगा-मुलगी दोघेही सुरुवातीच्या दिवसात परस्परांना समजून घेतल्यानंतर लग्नाचा उद्देश ठेवतात. पण तेच नशिबवान असतात, ज्यांच हे स्वप्न सत्यात उतरतं. प्रत्येकजण इतका नशिबवान नसतो. प्रेमात यश मिळालं नाही, तर आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. काहीजण आपल्या जुन्या प्रेम संबंधातून कधीच बाहेर येत नाहीत. शेवटी, शेवटी ते टोकाचं पाऊल उचलतात. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात असच काहीस झालं. तिथे एका युवकाने विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं. असं यासाठी कारण त्याला गर्लफ्रेंडच असं एक सिक्रेट समजलं, ज्याचा धक्का त्याला पचवता आला नाही.

पहासू पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या फजलपूर गावचा विषय आहे. 22 वर्षाच्या अरुणने घरातच विषारी पदार्थ प्राशन केला. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. तडकाफडकी नातेवाईक अरुणला रुग्णालयात घेऊन गेले. त्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन युवकाला हायर सेंटरमध्ये रेफर करण्यात आलं. उपचारादरम्यान अरुणचा मृत्यू झाला. मृतक पॉलिटेक्निक करुन कासिमपूर पावर हाऊसमध्ये अप्रेंटिस शिप करत होता. त्याच्या मृत्यूमुळे नातेवाईकांची रडून, रडून वाईट अवस्था आहे. या प्रकरणात कुठलीही तक्रार दिलेली नाही.

पण तो नेहमी उदास असायचा

वडिल देवदत्त यांनी सांगितलं की, शेजारच्या गावात राहणाऱ्या युवतीसोबत अरुणचे प्रेमसंबंध होते. युवतीच दुसऱ्याठिकाणी लग्न ठरलेलं. त्यामुळे अरुण डिप्रेशनमध्ये गेला. आम्ही त्याला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण तो नेहमी उदास असायचा. अरुणच्या डोक्यात काय चाललेलं? हे मला माहित नाही. गर्लफ्रेंडच लग्न ठरल्याने तो आतून कोसळून गेलेला. त्याने विष पिऊन जीवन संपवलं. अलीगढच्या वरुण रुग्णालयात उपचारादरम्यान अरुणचा मृत्यू झाला.

अजूनपर्यंत कुठलीही तक्रार दिलेली नाही

मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सीओ मधुप कुमार सिंह यांनी सांगितलं की, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अजूनपर्यंत कुठलीही तक्रार दिलेली नाही. तक्रारीच्या आधारावर कारवाई केली जाईल.