पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळली होती, अखेर सहनशक्तीचा अंत झाला अन् महिलेने स्वतःच…

पती-पत्नीचे लग्न झाल्यापासूनच पटत नव्हते. दररोज दोघांची या ना त्या कारणातून भांडणं व्हायची. शेजारीही मध्यस्थी करुन दोघांची समजूत काढायचे. पण दोघेही ऐकत नव्हते. अखेर भांडणाचा भयंकर अंत झाला.

पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळली होती, अखेर सहनशक्तीचा अंत झाला अन् महिलेने स्वतःच...
क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या
Image Credit source: TV9
| Updated on: May 06, 2023 | 9:31 PM

पश्चिम सिंगभूम : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजच्या भांडणाला कंटाळून महिलेने स्वतःचे कुंकू पुसल्याची घटना पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात घडली. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली आहे. बुधराम सामद असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. जिल्ह्यातील टोकलो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतिदुर्गम असलेल्या हातनबेडा गावात ही घटना घडली.

लग्न झाल्यापासून दोघांमध्ये भांडणे होत होती

मिळालेल्या माहितीनुसार, हातनबेडा गावातील 42 वर्षीय बुधराम समद यांचा काही वर्षांपूर्वी सीमा होनहागासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्रीही पती-पत्नीमध्ये वाद झाला. या भांडणातून पत्नीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. यानंतर शनिवारी सकाळी महिलेने टोकलो पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

शेजारीही अनेकदा समजूत काढायचे

पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं व्हायची. शेजारीही दोघांना नेहमी समजावयचे. पण दोघेही ऐकायला तयार नव्हते. अखेर या भांडणाचा भयानक अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच कल्लोळ माजला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us