‘द कपिल शर्मा’ शो मधील कलाकाराने लाईव्हवेळी नेमकं का पिलेलं फिनाईल, जाणून घ्या!

बॉलिवूड सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा' शोमधील कलाकाराने लाईव्हवेळी फिनाईल पित संपवण्याचा प्रयत्न केला होता.

द कपिल शर्मा शो मधील कलाकाराने लाईव्हवेळी नेमकं का पिलेलं फिनाईल, जाणून घ्या!
ज्विगाटो या चित्रपटानंतर कपिल शर्मा याला एक बिग बजेट चित्रपट मिळाला असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये करीना कपूर खान ही महत्वाच्या भूमिकेत आहे.
Harish Malusare | Updated on: Jun 15, 2023 | 9:22 PM

मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा’ शो फेम तीर्थानंद राव याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तीर्थानंद राव यानी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लाईव्ह असताना तीर्थानंद फिनाईल पिताना दिसला. त्यानंतर त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तो सुरक्षित असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

तीर्थानंद राव यानी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. यावेळी त्यानी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारणही सांगितलं.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तीर्थानंदने सांगितलं, जेव्हा पोलिसांनी माझ्या गर्लफ्रेंड बोलावलं तेव्हा तिनं ‘त्याला मरू देत, मी त्याला सोडून जात आहे’, असं सांगितलं आणि फोन ठेवला. तसंच तिनं माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मी तिला मागे घेण्यास सांगितलं तर तिनं माझ्याकडे मौल्यवान वस्तू आणि पैशांची मागणी केली.

माझ्या गर्लफ्रेंडला माझ्या घरात वाटा हवा आहे. नुकताच मी तिला दोन लाखांचा फोन दिला होता. तसंच मी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या शरीरात विष पसरले होते. पण सुदैवानं माझ्यावर वेळीच उपचार झाले आणि आता मी पूर्णपणे बरा आहे. मला माझ्या कृतीची लाज वाटतीये पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. गर्लफ्रेंडनं केलेली तिची खोटी केस मागे घ्यावी आणि या सगळ्यातून माझी सुटका करावी अशी माझी इच्छा आहे. कारण मी माझे सर्व पैसे खर्च केले आहेत. तसंच मी माझ्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us