ना जयपूर, ना गोवा, या अभिनेत्रीच्या रेस्तराँमध्ये होणार सोनाक्षी- इक्बालच्या लग्नाचे रिसेप्शन

बॉलिवूडकरांच्या शाही विवाह सोहळ्यातील रिसेप्शनच्या यादीमध्ये जयपूर, गोवा ही ठिकाणे नेहमीच आघाडीवर असतात. पण, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल जोडीने मात्र लग्नाच्या रिसेप्शनसाठी मुंबईमधीलच एक खास ठिकाण शोधून काढलं आहे.

Mahesh Pawar | Updated on: Jun 22, 2024 | 10:22 PM
1 / 8
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने बॉलिवूडकरांना दिलेल्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट झाली.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने बॉलिवूडकरांना दिलेल्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट झाली.

2 / 8

चांगली मैत्री झाल्यावर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. यांची प्रेमकहाणी आता लग्नापर्यंत पोहचल्याचे दिसत आहे.

3 / 8

दोघांच्या लग्नाला दिग्गज अभिनेते आणि सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनीही आशिर्वाद दिले आहेत.

4 / 8

परंतु, ज्यावेळी घरच्या मंडळींना लग्नासंदर्भातील प्रश्न विचारला जातो त्यावेळी ही मंडळी आम्हाला लग्नासंदर्भात माहिती नाही, असे उत्तर देताना दिसतात.

5 / 8

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल या जोडीच्या रिसेप्शनला 'हिरामंडी' वेब सीरिजमधील कलाकार हजेरी लावणार असल्याची माहिती देखील समोर आलीये.

6 / 8

शिल्पा शेट्टीच्या मालकीचे मुंबईतील बास्टियन हे रेस्तराँ अलिशान रेस्तराँपैकी एक आहे.

7 / 8

कोहिनूर टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या या रेस्तराँमधून 360 अंशात मुंबईचं दर्शन होतं.

8 / 8

450 जणांच्या बैठकीची व्यवस्था असणाऱ्या या रेस्तराँमध्ये एक पूलही आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us