भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले : नवाब मलिक

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे.

भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 12:37 PM

मुंबई : “तुम्ही 25 तारखेला मोर्चा काढाल, पण भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले आहेत”, असा खोचक टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला (Minister Nawab Malik slams BJP). महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (17 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यानंतर आज नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर सडकून टीका केली.

“सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डोक्यातील कायदे आहेत. भाजपने या कायद्यांची माहिती लोकांपर्यंत नीट पोहोचवलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये या कायद्यांबाबत भीती निर्माण झाली आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

“एनआरसीला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार आहोत. या कायद्याला आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही. भाजपने त्यांच्या पक्ष कार्यालयांत आंदोलने करावीत, कारण तेच लोकांपर्यंत हे कायदे नीट पोहचवू शकले नाहीत”, असा सल्ला नवाब मलिक यांनी भाजपला दिला.

नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. “चंद्रकांत पाटील यांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी स्वत:चा इलाज करावा. त्यांनी चांगला डॉक्टर बघावा. त्यांना रोग झाला आहे”, असा घणाघात नवाब मलिक (Minister Nawab Malik slams BJP) यांनी केला.

“कमळाबाईंना शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली आणि संसार थाटला नाही. शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली म्हणून त्यांना त्रास होतोय. आता ते रडत बसले आहेत. त्यामुळे सर्वकाही सुरु आहे. मात्र, त्याचा काही एक उपयोग होणार नाही”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी टीका केली.

नवाब मलिक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावरुनही भाजपवर निशाणा साधला. “तुम्ही ट्रम्पला आणता. मात्र, अमेरिकेतील निवडणुकीचा हा एक प्रकारचा प्रचार आहे. देशाला या गोष्टीचा काहीच फायदा होणार नाही. देशात बेरोजगारी वाढली आहे. मोदींना देशातील गोरगरिबांची लाज वाटते. हे योग्य नाही”, असंदेखील नवाब मलिक म्हणाले.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.