भारत जबर अडकला, थेट बांगलादेशाने दिली धमकी, 5 ऑगस्टलाच..

बांगलादेश आणि भारताचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यामध्येच बांगलादेशाने भारताला मोठा इशारा दिला. फक्त इशाराच नाही तर दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल, असेही त्यांनी म्हटले.

भारत जबर अडकला, थेट बांगलादेशाने दिली धमकी, 5 ऑगस्टलाच..
Bangladesh and india
| Updated on: Aug 04, 2026 | 7:21 AM

बांगलादेश आणि भारताचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यामध्येच आता भारताला थेट धमकी बांगलादेशाकडून देण्यात आली. बांगलादेशने भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवावी, अशी मागणी केली. हेच नाही तर भारतात बांगलादेशातून पळून गेलेले लोक अस्थिर संबंध करत असल्याचे त्यांनी म्हटले. याचा परिणाम दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. पहिल्यांदा बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान हसीना यांनी भारतात आल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिकपणे लोकांसमोर येण्याचे जाहीर केले. याच प्रकरणात राज्यमंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी म्हटले की, भारतासोबतचे भविष्य बघून पुढे जात आहोत. आम्हाला त्यांच्यासोबतचे संबंध खराब करायची नाहीत. माझे अगदी स्पष्ट म्हणणे आहे की, भारतालाही आमच्यासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारताला स्पष्ट करावे लागेल की, ते देखील याचे समर्थन करतात की नाही.

यादरम्यान राज्यमंत्र्यांनी म्हटले की, आगामी कार्यक्रम भारतात आयोजित केले जाणार नाहीत. पुढची परिस्थिती पाहून ढाका याबाबत निर्णय घेईल. हे बघून ठरवले जाईल की, दिल्लीला द्विपक्षीय संबंध सुरू ठेवायचे की नाही. जर वाटले की, त्यांनाही गरज आहे तर संबंधित विदेश मंत्रालयासोबत संपर्क साधला जाईल. रिपोर्टनुसार, शमा यांनी म्हटले की, बांगलादेशातून पळून जाणाऱ्या दोषींना भारताने त्यांच्या जमिनीचा वापर करू देऊ नये.

जर भारतात पळालेल्या व्यक्तीमुळे बांगलादेशाच्या स्थिरतेवर काही परिणाम झाले आणि अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा थेट परिणाम दोन्ही देशाच्या संबंधांवर पडेल. असे होऊ शकते पण आम्हाला असे पाहिजे नाही. आम्हाला नक्कीच भारतासोबतचे संबंध सुधारायची आहेत. मला वाटते की, भारतालाही हेच हवे आहे.

बांगलादेशाने 5 ऑगस्ट रोजी हसीना यांचे सार्वजनिक भाषण भारताने रोखले पाहिजे, यावर भर दिला. यासोबतच जर असे झाले नाही तर याचे परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर होईल, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. हसीना 5 ऑगस्ट रोजी संबोधित करणार आहेत. मात्र, हसीना यांना रोखण्यासाठी भारतावर प्रचंड दबाव आहे. बांगलादेश विविध प्रकारे भारताला धमकावत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us