AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दगडात भारताने मारले 3 पक्षी, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशला हादरा, थेट 45000 कोटीचे..

पाकिस्तानसोबत भारताचे कायमच तणावाचे संबंध राहिले आहेत. चीनसोबतचे संबंध गेल्या काही दिवसांपासून सुधारताना दिसत आहेत. मात्र, बांगलादेशाचे संबंध 2024 नंतर तणावात आहेत. आता भारताने एकाचवेळी तब्बल तीन देशांना झटका दिला.

एका दगडात भारताने मारले 3 पक्षी, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशला हादरा, थेट 45000 कोटीचे..
india
| Updated on: Aug 03, 2026 | 2:53 PM
Share

भारताने मास्टर प्लान तयार केला. भारताच्या या मास्टर प्लानने चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची झोप उडाली. भारताने आपल्या सीमा अधिक सुरक्षा आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. ज्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांचे आयुष्य बदलेल. ज्यामुळे सीमा भागात रणगाडे आणि तोफा अधिक जास्त प्रमाणात आणि अगदी सहजपणे तैनात करणे शक्य होईल. चीन, पाकिस्तान, बांगलादेशला लागून असलेल्या संवेदनशिल सीमावर्ती भागात रेल्वे जाळे अधिक बळकट करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले. ज्याकरिता भारत तब्बल 45 कोटी खर्च करणार आहे. सीमावर्तीय भागात रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत केले जाईल. पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम या भागात भारत रेल्वे लाईनचे काम करण्याच्या तयारीत आहे.

रेल्वे लाईन, प्लेटफॉर्म आणि आधुनिक नेटवर्क उभे केले जाईल. भारत एकाच दगडात तीन पक्षी मारत आहे. दुर्गम भागात कोणत्याही अडथळ्याशिवाय भारत शस्त्रे आरामात पाठू शकणार आहे. यामुळे पर्यटन, रोजगार आणि व्यापार यांच्या वाढीसाठी मदत होईल. पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्यात आणि भारतात अतिसंवेदनशिल भाग आहे. चीनसोबत एलएसी तणाव आहे.

पाकिस्तान आणि भारतात कायमच तणाव राहिला आहे. 2024 नंतर भारत आणि बांगलादेशाचेही संबंध तणावात आहेत. भारताकडून सीमा भागात रेल्वे नेटवर्क उभारले जात असल्याने या तिन्ही देशांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. भारत हे रेल्वे नेटवर्क उभारत मोठा संदेश देत आहे. भारताकडून तब्बल 1700 किलोमीटरची रेल्वे लाईन टाकली जाईल.

सीमावर्तीय भागात रेल्वे नेटवर्क उभारल्याने भारतीय ताकद वाढणार आहे. काही असे दुर्गम भाग आहेत, जिथे शस्त्र पाठवणे म्हणजे मोठे कठीण काम आहे. पण आता भारत तिथेच रेल्वे नेटवर्क उभे करत आहे. ज्यामुळे हे शस्त्र पाठवण्यासाठी लागणारा वेळ, खर्च सर्वच काही कमी होऊ शकतो. यासोबतच रेल्वेचे नेटवर्क उभारल्याने सीमावर्तीय भागातील नागरिकांना मोठा आधार होईल. तशी पाऊले भारताकडून उचलली जात आहेत.

Follow Us
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30...
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच...
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण?
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत