AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी

Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी

| Updated on: Sep 19, 2026 | 3:12 PM
Share

नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी केली. दीड-दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने पिके वाळली असून, सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. कृषिमंत्री एका आढावा बैठकीसाठी निघाले असताना, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि कोरडा दुष्काळ तात्काळ जाहीर झाला पाहिजे, अशा मागण्या करत घोषणा दिल्या. आंदोलक शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना वाळलेली पिके भेट देऊन, नांदेड जिल्ह्याची गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची दुर्भिक्ष निर्माण झाले आहे, पाऊस नसल्यामुळे सर्व पिके वाळून गेली आहेत. शेतकऱ्यांचा पोळा आणि गौरी पूजन दुष्काळात गेले असून, येणारी दिवाळीही दुष्काळातच जाणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतरच सरकारला जाग येणार का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांनी मंत्र्यांवर बांधावर न जाण्याचा आरोप करत, त्यांना बांधावरची वाळलेली पिके भेट दिली. जर कृषिमंत्र्यांनी लवकरच मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिली नाही, तर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

Published on: Sep 19, 2026 03:12 PM

Follow Us