AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले

UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले

| Updated on: Sep 19, 2026 | 3:24 PM
Share

राज ठाकरेंनी युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देऊन आता अचानक शुल्क आकारणे हा नागरिकांसाठी डिजिटल सापळा असल्याची त्यांनी म्हटले. सरकार नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे. नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना दिल्यानंतर आता अचानक युपीआय शुल्काची अंमलबजावणी करणे हा नागरिकांवर लावलेला डिजिटल सापळा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) अर्थात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क थेट सर्व व्यवहारांवर नसले तरी, त्याचा परिणाम व्यापारी आणि ग्राहक दोघांवरही होणार आहे.

राज ठाकरेंनी यावर बोलताना म्हटले की, आधी नोटबंदी करून डिजिटल व्यवहारांना महत्त्व दिले गेले, युपीआय प्रणालीचा प्रचार केला गेला आणि लोकांना त्याची सवय लावली. आता अचानक शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना डिजिटल सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असून, पंतप्रधानांनी परदेशात युपीआयचा प्रचार करून स्वतःची पाठ थोपटवून घेण्याऐवजी देशांतर्गत होणाऱ्या या शुल्काबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

Published on: Sep 19, 2026 03:23 PM

Follow Us