AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने भारताला ललकारले, थेट पंतप्रधानांची दिली युद्धाची धमकी, सुट्टी नाहीच..

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताला मोठी धमकी देण्यात आली. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच आता पाकिस्तानने भारताला थेट धमकी दिली.

पाकिस्तानने भारताला ललकारले, थेट पंतप्रधानांची दिली युद्धाची धमकी, सुट्टी नाहीच..
Pakistan Prime Minister Shehbaz Sharif
| Updated on: Aug 14, 2026 | 8:16 AM
Share

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर निशाणा साधला. हेच नाही तर त्यांनी भारताला मोठा इशारा आणि धमकी दिली. इस्लामाबादमध्ये आयोजित यादगार ए फतह कार्यक्रमात बोलताना त्यांनी सिंधु जल कराराच्या मुद्द्यावर भारताला धमकी दिली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचा एक एक पाण्याचा थेंब रेड लाईन आहे. जर भारत मागे हटला नाही तर पाकिस्तान सरळ उत्तर देईल. युद्ध पेटू शकते. भारताने एप्रिल 2025 मध्ये भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधु जल करार स्थगित केला. ज्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला. भारताने पाकिस्तानी ठिकाणांना टार्गेट करत मोठे हल्ले केले. पीएम शहबाज शरीफ यांनी यादरम्यान असे काही शब्द बोलले ज्यानंतर जग त्यावर हसत आहे. जो देश दहशतवाद पसरवतो आणि दहशतवाद्यांना तयार करून पोसतो, त्याच देशाचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, पाकिस्तान शांती, सन्मानसोबत उभा आहे.

शरीफ यांचे हे विधान हस्सास्पद आहे. पहलामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी मोठे हल्ले केले जात होते. स्थिती युद्धाची होती. शेवटी दोन्ही देशांनी करार करत युद्ध थांबवले. भारत आणि पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा दावा कायमच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून केला जातो. मात्र, भारताने वेळोवेळी स्पष्ट केले की, दोन्ही देशांनी चर्चा करून हे युद्ध थांबवले आहे.

या भाषणावेळी शरीफ यांनी ट्रम्प यांच्याही नावाचा उल्लेख केला. ट्रम्प दावा करतात की, पाकिस्तान आणि भारतातील युद्ध मीच थांबले आणि हजारो लोकांचे जीव वाचवले. पाकिस्तानने चीनला आपला मित्र म्हटले असून वाईट काळात चीन कायमच आपल्या सोबत उभा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. एकीकडे शरीफ शांतीबद्दल बोलताना दिसले तर दुसरीकडे भारताला धमक्याही देताना दिसले.

सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर त्यांनी भारताला धमकी दिली. भारताकडून आता याला नक्की काय उत्तर दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पाकिस्तानने तुर्की, साैदी अरेबियासोबत संरक्षण करार केला. या कराराचा अर्थ असा की, तीनपैकी एका देशावर झालेला हल्ला तीन देशांवर समजला जाईल.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान