मिठाई फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? 90 टक्के लोकांना माहित नसेल मिठाई साठवण्याची योग्य पद्धत

बऱ्याचदा आपण राहिलेली मिठाई फ्रिजमध्ये ठेवतो. पण 2 दिवसातच त्या मिठाई कडक होतात. तसेच चवीलाही बेचव आणि कडवट लागतात. 90% लोकांना मिठाई साठवण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने हे होते. चला जाणून घेऊयात की मिठाई , गोड पदार्थ साठवून ठेवण्याची योग्य पद्धत काय आहे ते.

मिठाई फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? 90 टक्के लोकांना माहित नसेल मिठाई साठवण्याची योग्य पद्धत
Is it okay to keep sweets in the fridge 90 percent of people may not know the correct way to store sweets
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2025 | 5:51 PM

दिवाळी असो किंवा इतर कोणताही सण, गोड पदार्थ, मिठाई नेहमीच घरात आणले जातात. त्यानंतर उरलेली मिठाई आपण फ्रिजमध्ये ठेवून देतो जेणेकरून ती बऱ्याच दिवस टिकेल. पण तुम्हासा ही गोष्ट कधी लक्षात आली आहे की, फ्रिजमध्ये ठेवलेल्या या मिठाई 2 ते 3 दिवसांनी त्या कडक, कोरड्या होतात आणि त्यांची चवही बेस्वाद किंवा कधीकधी कडू लागते. याचे कारण म्हणजे गोड पदार्थांना चुकीच्या पद्धतीने फ्रिजमध्ये साठवणे.

खरं तर, YouTuber फूड एक्सपर्ट वृंदा दरयाणी यांनी उरलेल्या गोड पदार्थांना योग्य पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवण्याची पद्धत सांगितली आहे. जेणेकरून, त्या फक्त 2 दिवसांत कोरड्या आणि बेस्वाद होणार नाहीत. कोणतेही गोड पदार्थ किंव मिठाी 8 ते 10 दिवसांसाठी ताजे आणि चविष्ट देखील ठेवू शकता.

मिठाईचा डबा थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळा

जवळजवळ 90% लोकांकडून होणारी सर्वात सामान्य चूक म्हणजे मिठाई थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे. बाजारात उपलब्ध असलेले कंटेनर पूर्णपणे हवाबंद नसतात, ज्यामुळे रेफ्रिजरेटरमधील कोरडी, थंड हवा कंटेनरमधून मिठाईपर्यंत पोहोचते, ज्यामुळे पाणी आणि ओलावा लवकर बाहेर पडतो. यामुळे मिठाई लवकर सुकतात, त्यांचा पोत खराब होतो आणि त्यांना चव निघून जाते.

हवाबंद कंटेनर वापरा

दिवाळीच्या मिठाई ताज्या ठेवण्यासाठी, कंटेनर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी त्या बदला. काचेच्या किंवा चांगल्या फूड-ग्रेड प्लास्टिकपासून बनवलेला चांगल्या दर्जाचा हवाबंद कंटेनर निवडा. हवाबंद कंटेनर गोठलेल्या हवेला मिठाईच्या संपर्कात येण्यापासून पूर्णपणे रोखतात. हवाबंद कंटेनर ओलावा टिकवून ठेवतो, ज्यामुळे त्या जास्त काळ मऊ आणि स्वादिष्ट राहतात.


फॉइल पेपर किंवा बटर पेपरचा वापर

हवाबंद कंटेनर वापरताना, त्यावर फॉइल किंवा बटर पेपर लावायला विसरू नका , ज्यामुळे ओलावा टिकून राहतो. म्हणून, हवाबंद कंटेनरच्या तळाशी फॉइल किंवा बटर पेपर लावा. मिठाई त्यावर ठेवल्यानंतर, मिठाईवर फॉइलची पातळ शीट देखील ठेवू शकता. यामुळे दोन्ही बाजूंनी ओलावा टिकून राहतो.

बर्फी आणि रसगुल्ला किंवा गुलाबजाम कसे साठवायचे?

सर्व मिठाईंची साठवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. विशेषतः कोरड्या बर्फी आणि पाकातील मिठाई. जसं की रसमलाई, रसगुल्ला किंवा गुलाबजाम. तर अशा मिठाई कशा साठवायच्या ते पाहुया. या मिठाई फॉइलने झाकलेल्या हवाबंद डब्यात साठवाव्यात. त्या 8 ते 10 दिवस टिकतील. तथापि, ताज्या मिठाई नेहमी त्याच सिरपमध्ये किंवा पाकात बुडवून ठेवाव्यात ज्यामध्ये त्या बनवल्या गेल्या होत्या. त्या देखील हवाबंद डब्यात साठवाव्यात. शक्यतो अशा पाकातील मिठाई लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.