Nashik Grapes Farmer Issue | नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. “द्राक्षांची पंढरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर नैसर्गिक वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात ढगाळ वातावरण असून सकाळी थंडी आणि ढगाळ हवेच्या कारणामुळे दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे द्राक्षांवर थेट परिणाम होऊन त्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित होत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. “द्राक्षांची पंढरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर नैसर्गिक वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात ढगाळ वातावरण असून सकाळी थंडी आणि ढगाळ हवेच्या कारणामुळे दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे द्राक्षांवर थेट परिणाम होऊन त्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित होत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बऱ्याच द्राक्षबागांमध्ये कापणी आणि देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागला. काही द्राक्ष उत्पादकांनी जरी मोठा आर्थिक भार घेत आपल्या बागा वाचवल्या असल्या तरी, थंडी, ढगाळ वातावरण आणि उन्हाच्या तडाख्यामुळे द्राक्षांचे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आजरोजी बाजारात मिळणारा भाव जरी काही प्रमाणात जास्त दिसत असला तरी त्यातून उत्पादनाचा खर्चही परत येत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी जोरदारपणे केली आहे.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...

