येऊन येऊन येणार कोण? अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात…

| Updated on: Dec 22, 2019 | 4:48 PM

वृक्षांचे संवर्धन करण्याचं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं (sahyadri devrai actor Sayaji Shinde)  आहे.

येऊन येऊन येणार कोण? अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात...
Follow us on

बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या (sahyadri devrai actor Sayaji Shinde)  आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण निसर्गातील झाडे आपले ऑक्सिजन बँक असून त्यांची जोपासना करणे सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात येऊन येऊन येणार कोण? झाडांशिवाय आहेच कोण? अशी घोषणा देत वृक्षांचे संवर्धन करण्याचं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं (sahyadri devrai actor Sayaji Shinde)  आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी अभिनेता सयाजी शिंदे त्यांच्या टीमसह वनविभागाकडून बीडच्या पालवन येथे देवराई प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. येत्या जानेवारी या प्रकल्पाला तीन वर्ष पूर्ण होणार असल्याने याठिकाणी वृक्ष संमेलन घेण्यात येणार आहे.

या वृक्ष संमेलनानिमित्त येऊन येऊन येणार कोण…? झाडांशिवाय आहेच कोण…? अशी घोषणा सयाजी शिंदे यांनी पालवन येथे केली आहे. बीड शहरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर 207 हेक्टरवर हा प्रकल्प उभा आहे. यात 1 लाख 64 हजार विविध जातींच्या वृक्षाची लागवड करण्यात आली (sahyadri devrai actor Sayaji Shinde)  आहे.

याची जोपासना टँकरच्या पाण्यावर केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्रकल्पावर सध्या हिरवळ पसरली आहे. निसर्गाच्या सानिध्यातील झाडे जगवणे प्रत्येकाचे कर्तव्य असून त्याची जोपासना करा असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केलं आहे.