कोस्टल रोडचे पूल मोनोपाईल तंत्राद्वारे बांधणार, भारतात पहिल्यांदाच तंत्राचा वापर, काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे (Coastal Road) काम वेगात सुरु आहे. (Mono-pile Technology for Coastal Road)

कोस्टल रोडचे पूल मोनोपाईल तंत्राद्वारे बांधणार, भारतात पहिल्यांदाच तंत्राचा वापर, काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
coastal road
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 3:57 PM

मुंबई : ‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ असे घोषवाक्य असणारा आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे (Coastal Road) काम वेगात सुरु आहे. या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘एकल स्तंभ’ (Mono-pile Technology) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन सागरी किनारा मार्गाचा भाग असणाऱ्या पुलांखाली 176 खांबांची उभारणी केली जाणार आहे. (Mono-pile Technology will be used For Mumbai Coastal Road in first time in India)

या दृष्टीने सुरुवातीला ३ चाचणी स्तंभांची उभारणी एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात येणार असून यासाठीच्या कार्यवाहीस नुकतीच सुरुवात झाली आहे. यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री युरोपातून आणण्यात आली आहे. अशाप्रकारचे तंत्रज्ञान अंमलात आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव असणारे परदेशातील कुशल तंत्रज्ञ देखील या कामी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत, अशी माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली आहे.

एकल स्तंभ कसा उभारणार?

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या सागरी किनारा मार्गांतर्गत साधारणपणे 34 मीटर रुंदीचे आणइ सुमारे 2 हजार 100 मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर एकूण लांबी 15.66 किलोमीटर लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) देखील बांधण्यात येणार आहेत. सामान्यपणे समुद्र, नदी, तलाव इत्यादींवर पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणाऱ्या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ (Group Pile) पद्धतीने केली जाते.

यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे साधारणतः 4 स्तंभ उभारण्यात येतात. मात्र, एकल स्तंभ (Mono-pile) पद्धतीमध्ये त्या ऐवजी खालपासून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो. यानुसार सागरी किनारा प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणा-या पुलांखाली 176 स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

Mono-pile Technology

Mono-pile Technology एकल स्तंभ तंत्रज्ञान

बांधकामाच्या वेळेत आणि खर्चात बचत होणार

परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या 176 खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे 4 आधार स्तंभ यानुसार एकूण 704 स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च आणि वेळ देखील अधिक लागू शकला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत.

त्यामुळे 704 स्तंभांऐवजी 176 स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या 704 वरुन 176 इतकी कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार असल्याने तुलनेने अधिक पर्यावरणपूरकता साधली जाणार आहे. तसेच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत आणि खर्चात देखील बचत शक्य होणार आहे.

एकल स्तंभाची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

• अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणा-या 176 स्तंभांचा व्यास हा प्रत्येकी 2.5 मीटर, 3 मीटर व 3.5 मीटर अशा 3 प्रकारच्या आकारात असणार आहे. प्रत्येक ठिकाणची गरज शास्त्रीय पद्धतीने तपासून त्या-त्या ठिकाणच्या गरजेनुसार स्तंभांचा आकार निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार या स्तंभांची उभारणी केली जाणार आहे.

• भारतात पहिल्यांदाच याप्रकारच्या एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे हे काम अधिकाधिक सुयोग्यप्रकारे व्हावे आणि शास्त्रीय-वैज्ञानिक दृष्ट्याही परिपूर्ण असावे. यासाठी जगभरात ज्या ठिकाणी अशाप्रकारे पुलांची उभारणी करण्यात आली आहे. अशा पुलांचा सविस्तर अभ्यास महापालिका अभियंत्यांच्या चमू व संबंधीत सल्लागार करणार आला होता. तो केल्यानंतर सागरी किनारा मार्गासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर भारतात पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे परदेशातील ज्या तंत्रज्ञांना या प्रकारच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे, अशा कुशल तंत्रज्ञ मंडळींना सागरी किनारा मार्गासाठी पाचारण करण्यात आले आहे. ही मंडळी आता सागरी किनारा मार्गाच्या उभारणीसाठी कार्यरत चमुचा भाग आहेत.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध नसल्याने ती युरोपातून आयात करण्यात आली आहे.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर भारतात पहिल्यांदाच होणार असल्याने प्रत्यक्ष बांधकामापूर्वी 3 चाचणी स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. हे 3 चाचणी स्तंभ अनुक्रमे 2.5 मीटर, 3 मीटर, आणि 3.5 मीटर या व्यासाचे असणार आहेत. तर या स्तंभांची जमिनीखालील आणि जमिनीवरील एकूण उंची ही सुमारे 18 मीटर इतकी असणार आहे.

• यानुसार ३ चाचणी स्तंभ उभारण्याची कार्यवाही ही नुकतीच सुरु झाली आहे. वरळी परिसरातील अब्दुल गफार खान मार्गावर असणा-या बिंदू माधव ठाकरे चौकानजिकच्या सागरी किनारा मार्गाच्या जागेत या स्तंभांची उभारणी करण्यात येणार आहे. साधारणपणे जुलै अखेरपर्यंत या स्तंभांची उभारणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार उभारण्यात आलेल्या चाचणी स्तंभांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या टनांचा दाब उभ्या आणि आडव्या पद्धतीने देण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे स्तंभांची भार वहन क्षमता आणि धक्के सहन करण्याची क्षमता मोजली जाणार आहे.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार, पुलाच्या निर्धारित ठिकाणी उभारण्यात येणा-या प्रत्यक्ष स्तंभांच्या बांधकाम कार्यवाहीस पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर २०२१ नंतर सुरुवात होणार आहे. (Mono-pile Technology will be used For Mumbai Coastal Road in first time in India)

संबंधित बातम्या :

कोस्टल रोडचं काम प्रगतीपथावर, पुढील दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा मानस

दक्षिण मुंबई पहिल्यांदाच तुंबली, पर्यावरण तज्ज्ञांचं मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टकडे बोट

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.