‘भालके नेहमी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला’

| Updated on: Nov 28, 2020 | 1:10 AM

आमदार भारत भालके यांच्या जाण्यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही भालके यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे.

भालके नेहमी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke died at ruby hall clinic) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण राजकीय विश्वात शोककळा पसरली आहे. आमदार भारत भालके यांच्या जाण्यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही भालके यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. (Sachin Sawant tweeted a tribute MLA Bharat Bhalke)

सचिन सावंत यांनी ट्वीट करत भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की ‘आमदार भारत भालके यांचे निधन अत्यंत दुःखदायक व अविश्वसनीय आहे. काँग्रेस पक्षात असताना त्यांचा अनेकदा संपर्क यायचा. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची धडपड व कारखान्याच्या करिता चिंता मी पाहिली आहे. एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली’

खरंतर, गेल्या काही दिवसांपासून भालके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. तेव्हापासून भारत भालके त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Sachin Sawant tweeted a tribute MLA Bharat Bhalke)

गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते. अखेर शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

इतर बातम्या –

Photos : जनसामान्यांचा लोकप्रिय नेता भारत भालके!

Bharat Bhalke | आमदार भारत भालकेंची प्रकृती नाजूक, शरद पवार हॉस्पिटलमध्ये भेटीला

(Sachin Sawant tweeted a tribute MLA Bharat Bhalke)