शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन जखमी

अमरावती: शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली. या दुर्घटनेत तीन विद्यार्थी जखमी आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरावती जिल्यातील आष्टी येथील मणिबाई छगनलाल देसाई शाळेची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. वैभव हरीदास गांवंडे असं 14 वर्षीय मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो देवरी निपानीचा रहिवासी होता. तर […]

शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन जखमी
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

अमरावती: शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली. या दुर्घटनेत तीन विद्यार्थी जखमी आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरावती जिल्यातील आष्टी येथील मणिबाई छगनलाल देसाई शाळेची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली.

वैभव हरीदास गांवंडे असं 14 वर्षीय मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो देवरी निपानीचा रहिवासी होता. तर या दुर्घटनेत आष्टीचा 14 वर्षीय प्रतिक विलास पायतले, सार्थक जगदीश भुजाडे आणि आदित्य महादेव बुध रा. अनकवाडी हे तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

शाळेची मधली सुट्टी झाली होती. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेच्या मागील बाजूला खेळायला गेले होते. या शाळेच्या इमारतीची मागील भिंत अत्यंत तकलादू होऊन मोडकळीस आली होती. त्यामुळे ती भिंत पडली. या भिंतीखाली दबून वैभव गावंडे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शाळेच्या परिसरात ही दुर्घटना घडल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला आहे.