AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाड आणि लांब केसांसाठी कांद्याच्या रसात ‘या’ 2 गोष्टी करा मिक्स, काही दिवसांत दिसून येईल परिणाम

आजकाल प्रत्येकालाच केस गळण्याच्या समस्या सतावत आहेत. यासाठी अनेकजण घरगुती उपाय करतात. यामध्ये कांद्याचा रस हा प्रभावी उपाय मानला जातो. अशातच कांद्याचा रस केसांना लावल्याने केसांची वाढ जलद होते. तर कांद्यांच्या रसात तुम्ही जर या दोन गोष्टी मिक्स केल्यातर तुम्हाला जाड केसांनसह केसांची वाढ देखील होत राहील. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

जाड आणि लांब केसांसाठी कांद्याच्या रसात 'या' 2 गोष्टी करा मिक्स, काही दिवसांत दिसून येईल परिणाम
Long HairImage Credit source: Sonja Pacho/The Image Bank/Getty Images
| Edited By: | Updated on: May 30, 2025 | 1:40 AM
Share

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनहेल्दी जीवनशैली, वाढते वय, ताणतणाव हे यामागची अनेक कारणे आहेत. जर केस गळती कमी झाली नाही तर ती चिंतेचे कारण बनू शकते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी बहुतेकजण बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रोडक्टचा वापर करतात परंतु त्यामध्ये कॅमिकलचा धोका असतो. अशा परिस्थितीत फायद्याऐवजी केसांचे मोठे नुकसान होते. त्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून पाहता येतात. केसांची काळजी घेताना घरगुत‍ी उपाय करताना कांदा देखील लगेच लक्षात येतो. नैसर्गिकरित्या पौष्टिक असण्याव्यतिरिक्त, त्याचा रस केसांना लावल्याने केस मऊ करणे यासारखे अनेक फायदे मिळत असतात.

कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळतीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. कारण कांद्यामध्ये काही पोषक घटक असतात जे स्कॅल्प निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया कांद्याचा रस केसांसाठी कसा वापरता येईल.

कांद्याच्या रसाने बनवा हेअर मास्क

कांद्याचा रस आणि कोरफड जेल

कोरफड आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांना रेशमी आणि गुळगुळीत बनवतातच, शिवाय त्यांच्या वाढीसही मदत करतात. हे हेअर मास्क बनवण्यासाठी, कोरफड जेलमध्ये कांद्याचा रस टाकून मिक्स करा. आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर आणि स्कॅल्पवर चांगले लावा. व 30 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. तुम्ही हा हेअर मास्क आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

कांद्याचा रस आणि नारळ तेल

कांद्याच्या रसात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात, तर नारळाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे कोंड्याची समस्या कमी करतात. तसेच तुमच्या केसांना रेशमी, चमकदार आणि गुळगुळीत बनवण्यास देखील मदत करते. तर यासाठी केसांचा हेअर मास्क करण्यासाठी, कांद्याचा रस नारळाच्या तेलात चांगले मिक्स करा आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा आणि 45 मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा हेअरमास्क वापरल्यानंतर तुम्हाला चांगले परिणाम मिळायला सुरुवात होईल.

केसांना कांद्याचा रस लावण्याचे फायदे

कांद्याच्या रसात भरपूर सल्फर असते जे केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करते. केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळण्यास हे मदत करते. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसांमध्ये कोंडा आणि खाज सुटणे यासारख्या समस्यांपासून आराम देतात. कांद्याच्या रसाचा वापर केल्याने तुमचे केस लांब आणि दाट होतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?