लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तसंच मतदारांना आश्वस्त करत आहेत. बीडमध्येही महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारादरम्यान बोलताना पंकजा मुंडे यांनी बीडवासीयांना आवाहन केलं. यूट्यूब उघडलं की पंकजा मुंडे पडणार असं येत आहे… मला ही निवडणूक अवघड नाही. मला कुठलेही कपट कारस्थान न करता मतदान करा. मी जात कधीही काढणार नाही. ठिगळं लाऊन संसार करण्याची ताकत स्त्रीमध्ये असते. मी फेडणाऱ्या पैकी नाही, मी स्त्री आहे. मला शिवणं माहीत आहे. तुमचे मतदान मी कर्ज समजेन. व्याजासकट परत करेन, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी बीडकरांना केलं आहे.
आताची लोकसभा निवडणूक ही उज्वल भविष्याची आहे. शांत मनाने विचार करून मत द्या. विधानसभा निवडणूक पुढे आहे. ही निवडणूक संसदेची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा. आपल्या बीडमध्ये मी सर्वात मोठं कॅन्सर रुग्णालय उभं करणार आहे. मी आपल्या जिल्ह्यासाठी उद्योग आणणार आहे. लोकांचे प्रेम आणि विश्वास माझ्यावर आहे. सुरेश धस हे माझ्यासोबत सदैव आहेत. माझी एकट्याची लीड नव्हे तर सर्व मतदारांची लीड राहील. कलयुगात अस्त्र शस्त्र घेऊन पुढे चालावं लागेल. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
मी या भागात येणं नवीन नाही. 2009 ला मुंडे साहेब निवडणुकीला उभे होते. तेव्हा मी एक न एक गाव फिरले आहे. 2014 ला सुरेश धस आमच्याविरोधात राष्ट्रवादीकडून उभे होते. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमाणेच प्रीतम ताई यांची हट्रिक व्हावी अशी माझी ईछा होती. सध्याचे राजकारण डायनॅमिक झाले आहे. दोन दिवसात काहीही बदल होत आहेत. मी मागितले नाही तरीही मला उमेदवारी. मला मिळाली, हे ईश्वराचे दायित्व आहे. मी पालकमंत्री झाल्यावर जिल्हा परिषदेमध्ये सात सदस्य सुरेश धस यांनी दिले. जिल्हा परिषद ताब्यात घेतली. मुंडे साहेब गेल्यामुळे प्रीतम ताई राजकारणात आल्या. आताचा उमेदवार मी आहे. मी उमेदवार म्हणून पसंत आहे का? मग बदलून घ्यायचा का? पंकजा मुंडेंनी भर सभेत लोकांनी विचारले.
लहान बहिणीला जेवढे लीड दिलं. त्यापेक्षा छटाक भर मते मला जास्त द्या.. मी 22 वर्ष राजकारणात आहे. मग आता आभाळ का कोसळले आहे? ही निवडणूक संसदेची आहे. मोदी जी मला विचारतील पंकजा कुठे आहे म्हणून… तुम्हाला देखील अभिमान वाटेल बीडचे नाव दिल्लीत घुमेल. संसदेत मी उत्तर देईल. बीड जिल्हा हा माझं घर आहे, मी तुमची लेक आहे. आता मला निवडून द्या.. पुढे कोणालाही निवडून.आणू
परळीचे लोक सध्या परेशान आहेत. पाच वर्ष झाले हैराण आहेत, असं पंकजा मुंडे बीडमधील सभेत म्हणाल्या.