कुणाल जायकर, अहमदनगर : डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर येईल, सर्व भूत प्रेत मंत्र तंत्र बाहेर येईल असा अजब दावा वादग्रस्त कालीचरण महाराज यांनी केला आहे. अहमदनगर येथे सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आला होता. या मोर्चात कालीचरण महाराज, काजल दीदी हिंदुस्थानी यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. याच मोर्चात कालीचरण महाराज यांनी खळबळ जनक विधान केले असून कालीचरण महाराज यांच्या अजब दाव्याने मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी कालीचरण महाराज म्हणाले, लव्ह जिहादच्या रोजच्या 40 हजार केसेस आहे, दिल्लीत 35 केसेस मुलींच्या आल्या आहेत. मुलीचे वशीकरण करतात, धडग्यावर जे माथा टेकवताय त्यांच्या पोटी भूत जन्माला येतात असाही अजब दावा केला आहे.
तिकडे गेले की तुमच्यात मंत्र-तंत्र होते, त्यासाठी डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर , सर्व भूत प्रेत मंत्र तंत्र बाहेर येईल असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी केला.
धर्म म्हणजे सनातन धर्म, कोणता ही मौलाना म्हणणार नाही इस्लाम धर्म, त्यांना लहानपणापासून मदारश्यात शिकवले जाते, तुम्हाला काय शिकवले जातात असा सवाल कालीचरण यांनी केला.
सर्व आतंकवादी मुस्लिमच आहे, 5 लाख मंदिर फोडली होती, सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर हिंदू राष्ट्र झाल असता असंही मत कालीचरण यांनी व्यक्त केले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मुस्लिमांनवर विश्वास ठेऊ नका, दरोरोज 1 लाख गोवंश हत्या होते, हिंदू द्वेष करत नाही मात्र हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण होत आहे असा दावाही कालीचरण महाराज यांनी केला.
आपण सडक्या जातीवादाचा बुरखा पांघरलाय, आम्हाला परप्रांतीय नको असे आपण म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे राजे नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचा राजा होता असंही कालीचरण महाराज यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान कालीचरण महाराज यांनी केलेल्या दाव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कालीचरण यांनी केलेला दावा अजब असून खळबळ जनक असल्याने त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.