शेतकऱ्याकडे लाच मागणारा वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात; शेतीच्या बांधबंदिस्तासाठी मागितली 10 हजारची लाच

| Updated on: Jun 18, 2022 | 6:54 PM

शेतावरील बांधबंदिस्तासाठी परवानगी मागितल्यानंतर शिवदास सोनवणे याने शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानंतर लाच मागितल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सापळा रचून सोनवणे याच्याविरोधात कारवाई केली आहे.

शेतकऱ्याकडे लाच मागणारा वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात; शेतीच्या बांधबंदिस्तासाठी मागितली 10 हजारची लाच
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us on

पालघर: शेतकऱ्याकडून लाच (Bribe) मागणाऱ्या वनरक्षकाच्या लाचलुचपत विभागाकडून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. केवळ शेतावरील बांधबंदिस्तीसाठी शेतकऱ्यांकडून दहा हजारांची लाच मागणाऱ्या लाचखोर वनरक्षकाच्या पालघर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवदास सोनवणे (Shivdas Sonwane) असे लाचखोर वनरक्षकाचे (Forester) नाव असून दहा हजारांची लाच घेताना वनरक्षक सोनवणेसह एका खासगी इसमाला पालघर लाचलुचपतकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले आहे.

शेतावरील बांधबंदिस्तासाठी परवानगी मागितल्यानंतर शिवदास सोनवणे याने शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानंतर लाच मागितल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सापळा रचून सोनवणे याच्याविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वनविभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

ग्रामीण भागात सध्या भ्रष्टाचार फोफावला असून यात सरकारी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ही मोठी पिळवणूक होते. असाच काहीसा प्रकार डहाणूतील कासा येथे समोर आला आहे. शेतावरील बांधबंदिस्ती करण्यासाठी या वनरक्षकाने शेतकऱ्याकडून लाच मागण्यात आली होती.

 शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

या प्रकारामुळे वन विभागाबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. साध्या साध्या गोष्टींमुळे जर सामान्य माणसांना असा त्रास अधिकारी आणि कर्मचारी लोक देत असतील तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई का केली जात नाही असा सवाल ही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात

वनरक्षकावर कारवाई होताच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपासही सुरू आहे. वनरक्षकाबरोबरच आणखी एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर खासगी व्यक्तीला का आणले जाते आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.