AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Exam Result: इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, मुली पुन्हा चमकल्या! कुणाची बाजी, कुणाची हाराकिरी?

Maharashtra Board SSC Result 2026: इयत्ता 12 वी प्रमाणेच इयत्ता 10 वीचा निकाल 2 टक्क्यांनी घसरला आहे. कोकण विभागाने इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाला यादीत खालून प्रथम स्थान मिळाले आहे.

SSC Exam Result: इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, मुली पुन्हा चमकल्या! कुणाची बाजी, कुणाची हाराकिरी?
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, मुली पुन्हा चमकल्याImage Credit source: agency
| Updated on: May 08, 2026 | 11:53 AM
Share

Maharashtra Board SSC Result 2026: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. पत्रकार परिषदेत या निकालाचा घोषवारा जाहीर करण्यात आला. अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी निकालाची घोषणा केली. आज 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होईल. बारावीचा निकाल 2 मे रोजी लागला. त्यानंतर आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळाच्या आणि बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांसह पालकांना पाहता येईल. राज्यात १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावीत उत्तीर्ण झाले. राज्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला. इयत्ता 12 वी प्रमाणेच इयत्ता 10 वीचा निकाल 2 टक्क्यांनी घसरला आहे. कोकण विभागाने इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाला इयत्ता दहावीत सूर गवसला नाही.

दहावीचा निकाल ९२.०९ टक्के

राज्यात इयत्ता दहावीला १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता दहावीची टक्केवारी ९२.०९ इतकी आहे. एकूण २८ हजार २५ विद्यार्थी फॉर्म नंबर १७ भरून बसले. त्यापैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण. ७६.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर २८ हजार ८६७ विद्यार्थी बसले. त्यापैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी पास झाले. ३३. ८९ टक्केवारी उत्तीर्ण झाले. म्हणजे परीक्षेत एकूण सर्व मिळून १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला. दिव्यांग विद्यार्थी ९ हजार ९१२ बसले. त्यापैकी ९ हजार ४२ पास झाले. ९१.२२ टक्के निकाल जाहीर झाला.

बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीत मुली चमकल्या

इयत्ता बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीत मुली चमकल्या आहेत. मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.९६ टक्के आहे. तर ८९.५६ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. मुलांपेक्षा ५.४० टक्के मुलींचा निकाल अधिक. ६४ विषयाची परीक्षा घेतली. २० विषयाचा निकाल १०० टक्के लागल्याचा माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कोकण विभागाने मारली बाजी

कोकण विभाग टॉपला आहे. एक नंबरवर आहे. कोकण विभागाची टक्केवारी ९७.६२ टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला. या विभागाची टक्केवारी ८८.४१ टक्के इतकी आहे.

नागपूर 89.07 टक्के

छत्रपती संभाजीनगर 88.41 टक्के

मुंबई 94.97 टक्के

कोल्हापूर 95.47 टक्के

अमरावती 90.50 टक्के

नाशिक 90.93 टक्के

लातूर 88.42 टक्के

कोकण 97.62 टक्के

राज्यातील एकूण टक्केवारी 92.09

राज्यात नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,२२,८५१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

४,३१,१६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

३,८०,४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

१,३४,१३४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण

राज्यातील २३,६१२ माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी केली

त्यापैकी १५,५५,०२६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती

राज्यातील ६,६१२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला

मार्च २०२३, मार्च २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षांतील नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात वाढ झाली

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं