मुंबईः राज्यात बंडखोरी करून सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर या विषयावरून राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले आहे. या युतीविषयी ठाकरे गटच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी बोलताना सांगितले की आता प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचा विचार केला तर ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चांगली गोष्ट असल्याचं मतही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी आंबेडकर-ठाकरे युतीविषयी बोलताना सांगितले की, शिवतीर्थावर ज्या मी प्रवेश केला.
त्यावेळीच म्हणजेच 22 वर्षापूर्वीच मी जय भीम आणि जय महाराष्ट्र म्हणाले होते असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. अशी युती झाली तर राज्यासाठी ती चांगली गोष्ट असणार असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी या युतीचा विचार केला आहे. तर ते ठाकरे गटाचे हे स्वप्न 22 वर्षांनी पूर्ण होतं आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. त्यामुळे आता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असतील तर ती राज्यातील एक वेगळी नांदी ठरणार का असा सवालही यावरून विचारला जात आहे.
निलम गोऱ्हे यांनी या युतीविषयी सकारात्मक विचार केला असून उद्धव ठाकरे आता कोणता निर्णय घेतील तो चांगलाच असणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तर दुसरीकडे या युतीबाबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ज्यांनी कधी महापरिनिर्वाण दिना साधं कधी पोस्टर लावलं नाही त्यांनी आता हा राजकीय फायद्यासाठी युतीचा विचार केला असल्याची टीका त्यांच्यावर केली आहे.