मुंबई: महाराष्ट्रात भाजप सरकार होतं त्यावेळेस एकनाथ खडसे यांच्याकडे दहा खाती तर पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्राम विकास खातं दिलं होतं. आजही पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजप नेत्या म्हणून राज्यात उत्तम नेतृत्व करत आहेत. आज देशाचे पंतप्रधान ओबीसी (OBC) समाजाचे असून याहून ओबीसींचा मोठा सन्मान काय असेल, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. (BJP leader Pravin Darekar hits back Shivsena accusations over OBC reservation)
ते सोमवारी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांना डावलण्यात आल्याच्या शिवसेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. फडणवीस सरकार सत्तेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे महत्त्वाची दहा खाती देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामविकासचं खातं दिलं गेलं. आज ही त्या राष्ट्रीय स्तरावर भाजप नेत्या म्हणून ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.
प्रविण दरेकर यांनी ‘सामना’च्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली. वाघ कधी कुणाच्या इशाऱ्यावर चालत नाही तो फक्त सर्कसमध्येच चालतो. निधर्मवादीचे ढोल बडवणाऱ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार पणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. या सरकारने ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर आली, असा टोला दरेकर यांनी यावेळी लगवला.
रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना रोकडा सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल, नाना पटोलेंचा पलटवार
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल, मी स्वत: त्यांना भेटेन : संजय राऊत
(BJP leader Pravin Darekar hits back Shivsena accusations over OBC reservation)