Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ५ वेळी आमदार राहिलेल्या या नेत्याने दिला पदाचा राजीनामा

| Updated on: Sep 10, 2023 | 3:58 PM

उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांना एका मोठ्या नेत्याने धक्का दिला. पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ५ वेळी आमदार राहिलेल्या या नेत्याने दिला पदाचा राजीनामा
Follow us on

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक, १० सप्टेंबर २०२३ : नाशिकमधील एका मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकला. उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना ठाकरे गटाच्या उपनेत्याने आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअप केला. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. आपल्याला डावलले जात असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यामुळे पाच वेळा आमदार राहिलेल्या मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापासून फारकत घेतली आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा व्हॉट्सॲप केल्याची सूत्रांची माहिती आहे. शिर्डीत लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

म्हणून होते नाराज

बबनराव घोलप सध्या आउट ऑफ कव्हरेज आहेत. बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. काही दिवसांपूर्वी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज होते.

पाच वेळा राहिले आमदार

बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात 5 वेळा आमदार राहिले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच एका मोठ्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या शिर्डी, संगमनेर दौऱ्यात देखील बबनराव घोलप यांना डावलण्यात आले होते.

बबनराव घोलप यांनी ३० वर्षे एकहाती वर्चस्व ठेवलं. शिवसेनेचे दोन गट झाले. त्यात भाजपची ताकद वाढली. परंतु, तीस वर्षांची सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती. आपल्या लेकीला उभं करण्याचं ते स्वप्न पाहत होते. पण, भाऊसाहेब वाकचौरे पक्षात आल्याने ते अस्वस्थ होते. त्यामुळे नाराज झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं.